Friday, January 7, 2011

शाहजीराजांनी पुणे वसविले..सोन्याचा नांगर पांढरीवर धरिला..


७ जानेवारी २०११ च्या साप्ताहिक लोकप्रभामध्ये पांडुरंग बलकवडे ह्यांचा "दादाजीपंती सिउबास शहाणे केले" लेख छापून आला आहे..
ह्या लेखावरून कुठेही दादोजी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते असे दिसत नाही.. उलट बलकवडे ह्यांचा खोटारडेपणा दिसून येतो..इतिहास संशोधक जयसिंगराव पवार ह्यांनी दादोजी गुरु वा शिक्षक नव्हते हे पुस्तके,चर्चासत्रे,व्याख्याने,लेख ह्या माध्यमातून स्पष्ट केले असतानाही बलकवडे मात्र अजूनही त्यांचेच संदर्भ देतात..हा खोटारडेपणा तसा अनपेक्षितही नव्हता..

ह्या लेखाचा आशय बलकवडे ह्यांनी दिला आहे..तो असा..

पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरल्याचा जो प्रसंग लाल महालाच्या जागेत शिल्पबद्ध करण्यात आला आहे, त्या शिल्पात दादाजी कोंडदेवाचा समावेश असावा यात गैर तर काही नाहीच, उलट अशा इमानी पुरुषाचा समावेश त्या शिल्पात असावा ही गोष्ट अत्यंत उचित आहे.

ह्या लेखाचा समाचार घेताना कोल्हापूरचे इतिहास संशोधक ह्यांनी "चित्रलेखा" १७ जानेवारी २०११ मधून "दादोजीचा पुतळा हटला.. हे तो इतिहासाचे शुद्धीकरण" हा लेख लिहिला आहे... ह्या लेखाचा आशय थोडक्यात..

जेम्स लेनच्या वादग्रस्त पुस्तकाने लालमहाल पुढच्या समूह शिल्पातील दादोजी कोंडदेवाच्या पुतळ्याचे कारस्थान उघडकीस आणले..हे कुणाच्या अज्ञानामुळे घडले ? त्याला जबाबदार कोण..? लाल महाल,दादोजी कोंडदेव आणि सोन्याच्या फळाची नांगरणी..ह्या बद्दल इतिहास काय सांगतो..??

सावंत लिहितात.. ...अनेक चुकांनी भरलेल्या बखरींचा आधार घेऊन त्यांनी दादोजीला गुरु ठरविणे योग्य नाही..कारण या बखरीबद्दल इतिहास संशोधक सेतू माधवराव पगडी म्हणतात- मराठा साधनांपैकी एक्क्याणंव कलमी बखर काय किंवा चिटणीस बखर काय,उत्तर पेशवाईतील असल्यामुळे भारुडानी भरलेल्या आहेत..अशा बखरीमध्ये आलेला इतिहास हा आतापर्यंतच्या इतिहासकारांनी नाकारलेला आहे..एवढच नव्हे तर पुण्याचे इतिहासकार मेहेन्दलेही या बख्रीमधील इतिहास टाकाऊ आणि खोटा समजतात..(वाचा: राजा शिवछत्रपती,पृ १००-११२ )
दादोजी कोंडदेवाने पुण्याच्या भूमीवर सोन्याचा नांगर धरला कि नाही,याचाही मागोवा घेऊ..

ह्या लेखात बलकवडे लिहितात ....
"पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरल्याचा उल्लेख फक्त सहा कलमी शकावलीत आहे. तिच्यातील शेवटच्या कलमातील तो उल्लेख असा आहे :
‘शके १५५७ युव नाम संवत्सरी शाहजी राजे भोसले यांसी बारा हजार फौजेची सरदारी इदलशाईकडून जाली. सरंजामास मुलूक दिल्हे त्यात पुणे देश राज्याकडे दिल्हा. राज्यांनी (म्हणजे शाहजी राजांनी) आपले तरफेने दादाजी कोंडदेव मलठणकर यांसी सुभा सांगून पुणियास ठाणे घातले. तेव्हा सोन्याचा नांगर पांढरीवर धरिला. शांती केली. मग सुभेदार याणी कसब्याची व गावगनाची प्रांतात वस्ती केली.’’
पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरला असा उल्लेख असलेला हा एकमेव जुना कागद आतापर्यंत उजेडास आला आहे आणि त्यात दादाजी कोंडदेवाचा स्पष्ट उल्लेख आहे."

बलकवडे या शकावलीच सहावे कलम अपूर्ण देतात..मुळात ह्या शकावलीत लिहिले आहे

"शके १५५७ युव नाम संवत्सरी शाहजी राजे भासले(भोसले) यांसि बारा हजार फौजेची सरदारी इदलशाईकडून जाली सरंजामास मुलूक दिल्हे,त्यांत पुणे देश राज्याकडे दिलकहा राज्यांनी आपले तर्फेने दादाजी कोंडदेव मलटनकर यासी सुभा सागून पुनियास ठाणे गातले.तेंव्हा सोह्ण्याचा नांगर पांढरीवर धरिला.शांती केली.मग सुभेदार यांनी कास्ब्याची व गावगनाची प्रांतात वस्ती केली.कोल्याचे वशे दिल्हे.सहावे साली तनखा घेतला शाहजी राजे विजापूर प्रांती गेले "(कलम १)

बलकवडे ह्या शकावलीतले शेवटचे एक वाक्यच्या वाक्यच गाळतात..कारण ह्या वाक्यामुळे ह्या कलमाचा अर्थ स्पष्ट समजून येतो..सहावे साली तनखा घेतला शाहजी राजे विजापूर प्रांती गेले हे वाक्य नसेल तर सोन्याचा नांगर धरलेली घटना दादोजी कोंडदेव याने केली,असे स्पष्ट होते.आणि शेवटचे वाक्य दिले तर सोन्याचा नांगर शहाजी महाराजांनी स्वतः धरल्याच स्पष्ट होते..हि सहा कलमी शकावली ऐतिहासिकदृष्ट्या फारशी महत्वाची नाही..तरीही या शकावलीतील इतिहास स्वीकारून निष्कर्ष काढायचा झाला तर,सोन्याचा नांगर पुण्याच्या पांढरी वर धरला असेलच,तर तो शाहजीराजांनी धरल्याचे स्पष्ट होते..

No comments: