Saturday, October 30, 2010

B.G.Kolse Patil's Letter to Mayor.Remove Dadoji Konddev Statue Before 10th November 2010

Justice B.G.Kolse Patil Warns Pune Municipal Corporation to Remove Dadoji Konddev Statue From Lal Mahal Before 10th November 2010 otherwise Lokshasan Aandolan,sambhaji Brigade will Remove That Statue From lala mahal...He also send a Letter to Mayor of Pune MNC Demandin Removal Of Statue.

Thursday, October 28, 2010

वेळकाढूपणामुळे संभाजी ब्रिगेडचा दादोजी कोंडदेव समितीला विरोध...



महाराष्ट्र शासनाने ह्या पूर्वी ह्या प्रकरणी एक समिती नेमली होती..दादोजी कोंडदेव गुरु नसल्याचा निर्वाळा त्या समितीने दिला होता..तो निर्णय मान्य केला गेल्यामुळे नवी समिती नेमण्याची गरजच काय..?? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे..

इतिहासातील बनावटीकरणावर महात्मा फुलेंचे विचार..

गोब्राह्मनासह दादोजी कोंडदेवास फाजील आगन्तुकी करावयास लावल्यामुळे तसल्या बनावट पवाड्यांचा मी संचय केला नाही. - महात्मा फुले.

महात्मा फुलेंनी इतिहासातील घुसखोरी बद्दल, आगन्तुकी करणाबद्दल , बनावटी करणा बद्दल एका पत्रात उल्लेख केलेला आहे...
मामा परमानंद यांस पत्र.....................
------------- मुक्काम पुणे त|| २ माहे जून १८८६ ई||
.........राजमान्य राजेश्री नारायणराव माधवराव परमानंद मु|| आंबेर
......................... साष्टांग नमस्कार वि.वि. आपले त|| ३० माहे गुदस्तचे कृपापात्र पावले. त्याचप्रे|| पुण्याचे हायस्कुलातील भागवतमास्तर यांनी शंकर तुकाराम यांनी छापलेला पवाडयाचे पुस्तकातील काही शाहिरांची एक याद मजला आणून दिली, यावरून मी त्यास येक वेळी कळवले कि, सदरचे पवाडयाची प्रत मजजवळ नाही आणि ती पाहिल्याशिवाय मला याविषयी काही कळविता येत नाही. नंतर त्यांनी ते पुस्तक मला आणून दिले नाही. सबब त्याविषयी मला काही आपल्यास लिहून कळविता आले नाही.
..................... फितुरी गोपिनाथपंताचे साह्याने शिवाजीने दगा करून अफजुलखानाचा (वध?) केला. तान्हाजी मालूसऱ्याने घोरापाडीचे साह्याने सिंहगड किल्ला काबीज केला व शिवाजीने पुण्यात दरोडा घालून मुसलमान लोकांस कापून काढले. या सर्वाच्या कच्च्या हकीकतीचे खरे पोवाडे माझे पाहण्यात आले नाहीत. आज दिनपावेतो युरोपियन लोकांनी जे काही इतिहास तयार केले आहेत , ते सर्व क्षुद्र आणि अतिक्षुद्रांची वास्तविक स्थिती ताडून न पाहता +++ झाकून आर्यं भटब्राह्मणांचे ग्रंथावर व भटकामगारांचे सांगण्यावर भरवसा ठेऊन इतिहास तयार केले आहेत. व अलीकडे भटब्राह्मणांची विद्वान पोरेसोरे नवीन पवाडे करून हळूच मैदानात आणीत आहेत. त्यापैकी माझे पाहण्यातही बरेच आले आहेत आणि त्यातील क्षुद्रानी कमावलेल्या मोत्यापोवळ्यांचा चारा चरणारे भागवती, गोब्राह्मनासह दादोजी कोंडदेवास फाजील आगन्तुकी करावयास लावल्यामुळे तसल्या बनावट पवाड्यांचा मी संचय केला नाही.
.........आठ वर्षी जेव्हा मी मुंबईत आपले घरी भेटावयास आलो होतो, तेव्हा पांचगणीचे पाटील रामपासमक्ष आपल्यास क्षुद्र शेतकऱ्यांचे दैन्यवाण्या स्थितीचा काही देखावा जगापुढे आणणार, म्हणून कबूल केले होते. ते त्या देखाव्याचे असूड या नावाचे तीन वर्षापूर्वी एक पुस्तक तयार केले होते व त्याची एकेक प्रत आपले कलकत्याचे हरभास व अष्टपैलू गवरनर जनरल (साहेब?) श्रीमान महाराज बडोद्याचे गायकवाड सरकारास पाठविल्या आहेत. आमच्या क्षुद्रांत भेकडबाहुले छापखानेवाले असल्यामुळे ते पुस्तक छापून काढण्याचे काम तूर्त एके बाजूला ठेविले आहे. असुडाची प्रत आपल्यास पाहण्याकरिता पाहिजे त्याप्रमाणे लिहून आल्याबरोबर त्याची नकळ करण्यास लेखक बसवितो. नकल होण्यास सुमारे एकदोन महिने लागतील असा अदमास आहे. कळावे लोभ असावा हे विनंती.


------------------------------- आपला ---------
.........................................................................जोतीराव गोविंदरावफुले.


दूसरा भ्याला मेला बेत नव्हता पुर्वीचा .
दादोजी कोडदेवाचा.
मासा पाणी खेले गुरु कोण असे त्याचा...???

संदर्भ------- महात्मा फुले समग्र वांग्मय

thanks to http://ramadasswami.blogspot.com/

Tuesday, October 26, 2010

दादोजींचा पुतळा आम्हीच काढू

दादोजींचा पुतळा आम्हीच काढू...!!!




25 Oct 2010, 0746 hrs IST

इतिहासातले वाद मिटविल्याशिवाय वर्तमानातले वाद मिटणार नाहीत. लाल महालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा शांततेने हलवला जाणार नसेल, तर आम्ही तो हलवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिला. संभाजी ब्रिगेड आणि भारत मुक्ती मोर्चातर्फे रविवारी संघर्ष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष प्रदीप ढोबळे, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, बामसेफचे अध्यक्ष वामन मेश्राम, सचिव व्ही. व्ही. जाधव, पुरुषोत्तम खेडेकर, मुफती मोहम्मद युसुफ, ब्रिगेडियर सुधीर सावंत आदी उपस्थित होते. समाजात शांतता हवी असेल तर विकृत इतिहास नको. आंदोलन जसे दादोजी कोंडदेव यांच्या विरोधात आहे, तसेच ते इतिहास विकृत करणाऱ्यांच्या विरोधात असल्याचे गायकवाड यांनी नमूद केले. आजपर्यंत शांततेने पुतळा हलवण्याची मागणी आम्ही केली आहे. मात्र आता तो हलवला गेला नाही, तर आमचे कार्यकर्ते हलवल्याशिवाय राहणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बहुजन समाजाचा आजवर घातच केला आहे. जेम्स लेन प्रकरणातही सुप्रीम कोर्टात सरकारने चांगले वकील न पाठवल्याने निकाल विरोधात गेला. भांडारकर इन्स्टिट्यूटमधल्या अभ्यासकांनी लेनला मदत केल्यामुळे त्यांच्यावरही खटले भरण्याची मागणी त्यांनी केली. आपला खरा शत्रू कोण ते बहुजन समाजानाने ओळखण्याची गरज असल्याचे सावंत म्हणाले.

Monday, October 25, 2010

Sambhaji Brigade And Bharat Mukti Morcha





दादोजी कोंडदेव यांचा पुतळा 31 डिसेंबरपूर्वी हलविण्यात यावा



पुणे - या वेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड म्हणाले, ""महाराष्ट्रात शांतता हवी असेल तर लाल महालातील कोंडदेवांचा पुतळा तातडीने काढून टाकावा लागेल तसेच जेम्स लेनच्या पुस्तकाबाबत तातडीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी लागेल.''
भारत मुक्ती मोर्चा व संभाजी ब्रिगेड यांनी आयोजित केलेल्या संघर्ष मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी झालेल्या सभेत आठ ठराव करण्यात मंजूर करण्यात आले. लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा 31 डिसेंबरपूर्वी हलविण्याबरोबरच जेम्स लेनच्या पुस्तकाबाबत सर्वोच्च न्यायालयात तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी, या प्रमुख ठरावांचा यात समावेश आहे.
"ज्या हिंदू धर्माच्या नावाने अभिमानाने गळे काढले जात आहेत. मात्र, असा कोणताही धर्म पुरातन काळापासून अस्तित्वात नाही. हिंदू हा आक्रमक मुघलांनी येथील जनतेविषयी वापरलेला अवमानकारक शब्द आहे, चातुर्वर्णाचा पुरस्कार करणाऱ्या उच्च वर्णियांनी बहुजन समाजाला फसविण्यासाठी हिंदू या शब्दाला धर्माचे स्वरूप प्राप्त करून दिले. बहुजनांनी यापासून दूर राहिले पाहिजे'', असे मत "बामसेफ'चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी रविवारी येथे व्यक्त केले. लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा 31 डिसेंबरपूर्वी हलविण्यात यावा, असा ठराव या वेळी करण्यात आला.
ब्रिगेडियर सुधीर सावंत, प्रा. प्रदीप सोळंके, प्रा. प्रदीप ढोबळे, मुफ्ती महंमद सय्यद, प्रा. श्रीमंत कोकाटे, व्ही. डी. गायकवाड, पाटील यांची या वेळी भाषणे झाली. ब्रिगेडचे कार्याध्यक्ष शांताराम कुंजीर यांनी ठरावांचे वाचन केले. विकास पासलकर, रमेश राक्षे यांच्यासह अनेक पदाधिकारी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

Friday, October 22, 2010

संभाजी ब्रिगेड – भारत मुक्ती मोर्चा संयुक्त संघर्ष मेळावा… संभाजी ब्रिगेड – भारत मुक्ती मोर्चा संयुक्त संघर्ष मेळावा

संभाजी ब्रिगेड – भारत मुक्ती मोर्चा संयुक्त संघर्ष मेळावा…

संभाजी ब्रिगेड – भारत मुक्ती मोर्चा संयुक्त संघर्ष मेळावा…
महापुरुषांच्या सन्मानात, आम्ही उतरलो मैदानात…

दि.२४ ऑक्टोंबर २०१०, वेळ दु.३ वाजता…
स्थळ- एस.एस.पी.एम.एस. ग्राउंड, पुणे RTO शेजारी, पुणे…

Tuesday, October 19, 2010

२४ ऑक्टोबर ऐतिहासिक दिन ठरणार .... भारत मुक्ती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेड च्या मेळाव्यास जगभरातून प्रतिसाद

२४ ऑक्टोबर ऐतिहासिक दिन ठरणार ....
भारत मुक्ती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेड च्या मेळाव्यास जगभरातून प्रतिसाद

read todays mulnivasi nayak

www.mulnivasinayak.com

Monday, October 18, 2010

दादोजी कोंड्देवाचा पुतला हट्वलाच पाहिजे
शिवप्रेमी जनजागरण समिती

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे आणि प्रा. प्रतिमा परदेशी यांची भाषणे होणार आहेत
स्थळ: आचार्य अत्रे नाट्यगृह , संत तुकाराम नगर, वाय सी एम जवळ, पिंपरी-चिंचवड।

वेळ: गुरूवार दि. २१ आक्टोबर २०१० दुपारी ४ वाजता.

Wednesday, October 13, 2010

बहुजन समाज जागृत झाला असून अजूनही हा पुतळा हाटवला नाही तर तीव्र आंदोलन..

वास्तवाचा शोध घेऊन इतिहास समाजासमोर मांडावा
(Updated on 11/10/2010 0 : 19 IST)

लातूर (प्रतिनिधी) : इतिहासचे विकृत पद्धतीने लेखन केले जात आहे व त्यातून राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारख्या महापुरुषांचे चारित्र्य मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तवाचा शोध घेऊन इतिहास
समाजासमोर मांडावा, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे राज्य कार्यकारिणी चिटणीस प्रा. एस. व्ही. जाधव यांनी केले.
पत्रकार भवन येथे आयोजित दादोजी कोंडदेव हटाव परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र अध्यक्ष अ‍ॅड. गौतम भालेराव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. एस. व्ही. जाधव, प्रा. माधव गादेकर, कॉ. मुर्गप्पा खुमसे, शेकापचे राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण गोळेगावकर, प्रा. अर्जून जाधव, डॉ. श्रीराम गुंंदेकर, जमाअत-ए-इस्लामीचे इक्राम शेख, के. ई. हरिदास आदी मान्यवर उपस्थित होेते.
या वेळी पुढे बोलताना जाधव म्हणाले
दादोजी गोंडदेव कारकून म्हणून शिवरायाच्या काळात कार्यरत असताना त्यांचा इतिहासात गुरु असा उल्लेख आहे. क्रीडा क्षेत्रांशी त्यांचा काहीही संबंध नसताना दादोजी कोंडदेव क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. खरा इतिहास समोर येताच हा प्रकार बंद करण्यात आला व पुणे महानगरपालिकेच्या वतीने लाल महालात दादोजी कोंडदेवाचा पुतळा उभारण्यात आले याला प्रारंभी विरोधही करण्यात आला व विरूनही गेला. पण पुन्हा बहुजन समाज जागृत झाला असून अजूनही हा पुतळा हाटवला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
अध्यक्षीय समारोपात बोलताना अ‍ॅड. भालेराव म्हणाले की, आज गरज आहे. इतिहासाच्या तत्वज्ञानाची लिहलेल्या इतिहासातून चिकित्सा होऊन वास्तवाचा शोध घेऊन खरा इतिहास समाजासमोर मांडावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले. कोंडदेव हटाव परिषदेत कॉ. मुर्गाप्पा खुमसे, भाई लक्ष्मण गोळेगावकर, प्रा. अर्जून जाधव, प्रा. श्रीराम गुंदेकर आदी मान्यवरांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी लिखित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. श्रीराम गुंदेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय जाधव यांनी केले तर आभार प्रा. पाटील यांनी मानले कार्यक्रमाला उपप्राचार्य उद्धव कोळपे, अ‍ॅड. उदय गवारे, प्रा. राजीव ढवळे, प्रा. किरण बिडवे, सतीश जाधव, दत्ता भोसले, सी. एस. माळी, प्रा. उत्तमराव जाधव, राजकुमार जाधव, समाधान शिंदे, दगडू गव्हाणे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

"दादोजी कोंडदेवाचे इतिहासातील स्थान" - भास्कर धाटावकर

नवीन शिवइतिहास संशोधन ग्रंथ - "शिवचरित्रातील कल्पना आणि वास्तव ह्यांच्या सीमेवर"..-भास्कर धाटावकर. किंमत १५० रुपये,प्रकाशन - जून २०१०
"दादोजी कोंडदेवाचे इतिहासातील स्थान" हा लेख आवर्जून वाचण्यासारखा आहे...
नागेश बापट नावाच्या लेखकाने १८८२ मध्ये "राजगुरू दादोजी कोंडदेव आणि शिवाजी महाराज" नावाचे भयानक खोटारडे ५९ पानी पुस्तक लिहून दादोजीला मोठे केले..व पुढे इतर संशोधकांनी त्याचीच री ओढली..ह्याचा समाचार धाटावकर ह्यांनी घेतला आहे.."दादोजी आणि रामदास ह्यांच्यामुळेच शिवाजी घडला" हा वर्णाभिमान दिसतो..असे दुर्दैवाने म्हणावे लागते असे धाटावकर ह्यांनी नमूद केले आहे..दादोजीचे स्वराज्य निर्मितीस योगदानच काय.?,दादोजीचा मृत्यू,अस्सल कागदपत्रातातून दादोजीचे नावहि नाही..अशा अनेक गोष्टींचा परामर्श भास्कर धाटावकर ह्यांनी घेतला आहे..दादोजीचे स्थान कार्य दखलघेन्या एवढेही नसताना दादोजीचे शिवइतिहासात उदात्तीकरण का केले जाते असा प्रश्न ते उपस्थित करतात..

Saturday, October 9, 2010

दादोजी कोंडदेव सत्य इतिहास - अनंत दारवटकर ("अद्वितीय छ.श्रीसंभाजी महाराज")

दादोजी कोंडदेव सत्य इतिहास भाग १
दादोजी कोंडदेव सत्य इतिहास (साभार: अनंत दारवटकर लिखीत "अद्वितीय छ.श्रीसंभाजी महाराज) दादोजी कोंडदेवाचे आडनाव "गोचिवडे" होते१.तो शहाजी महाराजांकडे ज्या परगण्यांची वंशपरंपरागत पाटीलकी व देशमुखी जहागीरी होती त्या हिंगणी,बेरडी व देऊळगाव या परग्ण्यांचा कुलकर्णी व कानुंगो होता२.तसेच तो पाटस परगण्यातील मलठण गावचा हिशेबनीस होता.हे सर्व तो विजापुरकरांचा कारकुन म्हणुन विजापुरकरांसाठी करत होता.विजापुरकरांचसाठी करत असलेल्या कामाबद्दल इ.स.१६३० मध्ये त्याची बढती हवालदार पदापर्यंत झालेली दिसुन येते.ता.१८ सप्टेंबर १६३० च्या कौलनाम्यात "राजश्री पंत हवालदाराच कौलु दिल्हा आहे"३असा उल्लेख सापडतो.लखोजी जाधवरावांच्या म्रुत्युनंतर शहाजीराजे आपल्या जहागिरीच्या प्रांतात परतले.ते परांड्यावरुन संगमनेर येथुन लुटालुट करत पुण्यात आले होते.व त्यांनी अदिलशाही व निजामशाहीकडील अनेक किल्ले व प्रदेश घेण्याचा सपाटा लावला होता.तेव्हा विजापुरच्या खवासखानाचा कारभारी मुरार जगदेव याच्या सेनापतीत्वाखाली अदिलशाही सैन्याने शहाजीराजांच्या जहागीरीच्या प्रांतावर स्वारी केली४.ही स्वारी त्याने शके १५५२ म्हणजे इ.स.१६३०-३१ मध्ये केलेली होती५.या स्वारीबरोबर शहाजीराजे ३० नोव्हेंबर १६३० मध्ये आजमखान मोगलास मिळाले६.इकडे मुरार जगदेवाने पुणे कसबा वस्ती जाळोन गाढवाचा नांगर पांढरीवर धरिला७.यामुळे ७-८ वर्षे म्हणजे इ.स.१६३७ पर्यंत म्हणजे शहाजीराजे अदिलशाहीत जाइतोपर्यंत पुणे कसबा ओस पडला होता७.याचे दायीत्व अदिलशाही हवालदार म्हणुन दादोजी कोंडदेवाकडे जाते.यावेळी पुणे प्रांत शहाजी राजांची जहागिरी असली तरी त्यावर तात्पुरता अंमल मुरार जगदेवाच्या स्वारीमुळे अदिलशाहाचा होता व दादोजी कोंडदेव त्याची हवालदारकी करीत होता. दरम्यान निजामशाहीमध्ये उलथा-पालथ झाली.या संधीचा नेमका फायदा घेण्यासाठी शहाजी राजे मोगलांकडुन निजामशाहीत परतले.त्यांनी मुर्तुजा निजामशहास मांडीवर घेउन निजामशाहीचा कारभार पुर्ण अखत्यारीत सुरु केला.त्याच वेळी अदिलशहाने कोंडदेवास,पुणे प्रांताचा जो भाग अदिलशहाच्या ताब्यात होता त्याचा सुभेदार दिवाण केले.म्हणजे दादोजी कोंडदेव पुणे प्रांतातील अदिलशाही भागाचा "सुभेदार"झाला.दादोजी कोंडदेव सुभेदार असल्याचा उल्लेख जाउजी बिन हरजी व बापुजी बिन खेउजी घुले पाटील मौजे महंमदवाडी यांच्यासाठी दि.६ डिसेंबर १६३३ रोजी दिलेल्या मह्जरात सापडतो८.म्हणजे दादोजी कोंडदेवाने पुणे जाळण्यासाठी अदिलशहाच्या मुरार जगदेवास जे सहकार्य दिले होते त्याचे बक्शिस म्हणुन त्याची बढती "हवालदार" पदापासुन "सुभेदार" पदापर्यंत झाली होती असे ठरते.


(पुरावे:१.म्ह्सवडे जोशी यांचा महजर:अफजलखान वध,पा.२० तळटीप:श्रीशिछ-त्र्यंशंशे,पा.३७१. २.तारीख-इ-शिवाजी:शिवाजी द ग्रेट,भा.१,पा.२,१७:श्रीशिछ-त्र्यंशंशे,पा.३७१. ३.शि.प.सा.सं.क्र.३१२, ४.बु.उ.स.पा.२९८, ५,६.सहाकलमी शकावली, शिचप्र.,पा.७०,७१. ७.बादशहानामा,श्रीराशिछ-गभामे,पा.५८३, ८.शि.प.सा.सं.क्र.३७०,३७१.)

शिवजन्मापासुन ते दादोजी कोंडदेव विजापुरकरांचा सुभेदार होण्यापर्यंतच्या काळामध्ये दादोजी हा,जिजाऊ व शिवाजींच्या सेवेत असण्याचा काडीमात्र संबंध येत नाही.इ.स.१६३२ ते १६३६ अखेरपर्यंत शहाजी राजे मुर्तुजा निजामशहास मांडीवर घेऊन.निजामशाही सिंहासनावर बसुन कारभार करीत होते,मोगल आणि विजापुरकर यांच्याशी सतत संघर्ष व लढाई करीत होते,त्यावेळेस दादोजी कोंडदेव हा,शहाजी राजांच्या विरुध्द असलेल्या विजापुरकरांसाठी काम करीत होता.मुरार जगदेवाने पुणे जाळल्याने व शहाजी राजांचे मोगल व विजापुरकर यांच्या बरोबरील सततच्या लढाईमुळे पुणे परगणा ओसाड बनला होता१.अखेर अदिलशहा व मोगल शहाजहान यांच्यात करार झाला.मोगलांचा सेनापती खानजमान हा शहाजी राजांवर माहुली किल्ल्यावर चालुन गेला.येथे काही बाबी अदिलशहाच्या लक्शात आल्यानंतर खानजमान या मोगलाकडील सेनापतीचा हात ढिलाइने चालु आहे हे कारण पुढे करुन अदिलशहाने रणदुल्लाखानास पुढे करुन खानजमानच्या मदतीस पाठवीले.त्याने शहाजी राजास अदिलशहाकडे वळविले.आणि शहाजीराजांबरोबर करार केला.या करारानुसार मुर्तुजा निजामशहास खानजमान या मोगलाचे हवाली करुन माहुलीचा किल्ला आदिलशाहीत देऊन शहाजी राजे आदिलशाहीत सामील झाले२.तेव्हा पुणे परगणाही विजापुरांकडे गेला.आदिलशहाने विजापुर येथे शहाजी राजांचा सत्कार केला.त्यांना हत्ती,घोडे,जवाहीर देऊन पुणे,सुपे,बारामती,इंदापुर व बारा मावळे यांचा सरंजाम दिला३.परंतु त्याच वेळी आदिलशहाने त्याच्या फायदयाची एक महत्वाची गोष्ट केली,ती म्हणजे,पुणे प्रांताची सरंजामी दिलेल्या शहाजी राजांस पाठवीले कर्नाटकात,विजापुरच्याही दक्षिणेकडे आणि पुणे प्रांताचा कारभार सोपविला आपला विश्वासू माणुस दादोजी कोंडदेवाकडे !म्हणजे विजापुरकराने शहाजी राजांची जहागिरी कायम ठेवली परंतु विजापुरकरांकडे नोकरीस असलेल्या दादोजी कोंडदेवाकडे परगण्याचा कारभार पाहणेसाठी आला४.यावरुन दादोजी कोंडदेव कोणासाठी काम करीत होता हे लक्षात येते.तत्पुर्वी म्हणजे सन १६३६ च्या अगोदर पुणे परगणा निजामशहाकडे शहाजी राजांची जहागीर म्हणुन होता.तेव्हा त्याचा कारभार शहाजी राजांकडेच होता.त्यावेळेस दादोजी कोंडदेव विजापुरकरांचा चाकर असल्यामुळे त्याचा शहाजी राजांशी तथा शहाजी राजांतर्फे पुणे परगण्याच्या कारभाराशी संबंध नव्ह्ता. मुरार जगदेवाने पुणे जाळल्यापासुन पुढे सात-आठ वर्षे कसबा ओस पडला होता५.शहाजीराजे आदिलशाहीत आल्यानंतर, त्याचा कारभार दादोजी कोंडदेवाकडे आल्यानंतर म्हणजे इ.स.१६३६-३७ नंतर दादोजीने पुणे,इंदापुर व सुपे परगण्यांचा कारभार विजापुरकरांसाठी इमाने-इतबारे हाकण्यास सुरुवात केली.तत्पुर्वी पुणे परगण्याची स्थिती अत्यंत वाईट होती.त्याने त्यानंतर जंगली श्वापदांचा नायनाट करुन शेतीस उत्तेजन दिले.त्याने मलिक अंबरची महसुलाची पध्द्त-मलिक अंबरी धारा -स्वीकारुन विजापुरकराच्या खजीन्यात भर घातली व शहाजी राजांच्या जहागीरीत सुधारणा केली६.दादोजीच्या या इमाने इतबारीच्या सेवेबद्दल विजापुररांनी त्यास कोंडाण्याची सुभेदारी दिली.दि.२६ जानेवारी १६३८ मध्ये त्याने तंट्याबद्दल दिलेला एक महजर आहे. त्यात दादोजी कोंडदेऊ सुभेदार किल्ले कोंढाणा असा ऊल्लेख सापडतो७.त्याचप्रमाणे कोंढीतचा मोकादम बाबाजी नेलेकर याच्या हातुन गावची लावणी होइना यामुळे जनाजी खैरे व रुद्राजी जाधव परिंचेकर यांना मोकादमीचा वाटा देऊ करुन त्यांनी काम चालवील्यामुळे उत्पन्न झालेल्या तोट्याबाबत दिलेल्या महजरात दादोजी कोंडदेव सुभेदार८ असा उल्लेख सापडतो.

(पुरावे:१.श्रीशिछ९१ कलमी बखर क्र.२१;श्रीशिछ-त्र्यंशंशे,पा.३७१-७२. २.बु.-उ.-स.,पा.३३३.३.चिट्णीस२प्रकरण २.२.४.पादशहानामा (आयबी १५०);Shivaji and his Times,4th edn.page 18-19;श्रीशिछ-त्र्यंशंशे,पा.३७१;श्रीशिछ सच - मराचिब प्रकरण २.२ सहा कलमी शकावली ५. सहा कलमी बखर ६.श्रीशिछ ९१ क.ब.क.२१,श्रीशिछ सच -मराचिब प्रकरण २.२,श्रीशिछ-त्र्यंशंशे,पा.३७२ ७.शि.प.सा.सं.क्र.४३२. ८.शि.प.सा.सं.क्र.४३६.)

Friday, October 8, 2010

दादोजी कोंडदेव: भ्रम आणि वास्तव

दादोजी कोंडदेव: भ्रम आणि वास्तव

by Sanjay Sonawani on Thursday, October 7, 2010 at 8:18pm

१. दादोजी कोंडदेव हे प्रथमपासुन शहाजी राजांचे चाकर होते.

-हे सत्य नाही. दादोजी कोंडदेव हे आदिलशहाचे १६३६ पर्यन्त चाकर होते आणि ते आदिलशहातर्फे कोंडाना किल्ल्याचे सुभेदार होते, ती सुभेदारी पुढेही कायम झाली पण शहाजी राजांनी त्यांना पुणे जहागिरीवर लक्ष्य ठेवण्यासाठी आपलीही चाकरी दिली. ते सी. के. पी. होते असा एक मतप्रवाह आहे, पण तोही खरा नाही. ते देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण होते. शिरुर तालुक्यातील मलठण हे त्यांचे मुळ गाव. १६३६ साली कोंड्देव शहाजी राजांच्या सेवेत आले आणि ७ मार्च १६४७ रोजी त्यांचे निधन झाले.

शिवाजी महाराजांचा जन्म १६३० साली झाला. तेंव्हा दादोजी कोंडाना किल्ल्यची सुभेदारी आदिलशहातर्फे पहात होते. कोंडाना किल्ला शिवाजी महाराजांनी १६५७ साली काबीज केला...तो शहाजी राजांच्या जहागिरीत नव्हता....पण दादोजी कोंडान्याचे सुभेदारही होतेच...पण हयातीत त्यांनी शिवाजीमहाराजांना तो किल्ला मिळु दिला नाही.

१६३६ ते म्रुत्युपर्यंत दादोजी शहाजीराजांच्या सेवेत होते. शिवाजी महाराज दादोजी सेवेत आले तेंव्हा ६ वर्षांचे होते. असे मानले जाते कि शिवाजीमहाराज यांना लिहिता वाचता येत नव्हते. दादोजी जर त्यांचे गुरु असते तर असे घडले नसते. दुसरे असे कि दादोजी हे शिवाजीमहाराजांच्या स्वराज्य प्रयत्नांबाबत नेहमीच विरोधात होते. दादोजी हे कोंडाना किल्ल्याचे सुभेदार असुनही त्यांनी हयातीत शिवाजी महाराजांच्या हवाली किल्ला केला नव्हता हेही येथे लक्षात ठेवायला हवे. "तारिख-इ-शिवाजी" असे म्हनते कि शिवाजी महाराजांच्या स्वराज्य-धडपडीला वैतागुन दादोजींनी वीष घेवुन आत्महत्या केली. त्यासमयी त्यांचे वय ७२ होते. आदिलशहाने शिक्षा म्हणुन दादोजींचा एक हात तोडला होता.(१६४५). त्यावेळी शिवाजीमहाराजांचे वय १५ वर्ष असेल. त्यामुळे युद्धकला दादोजींनी शिवाजी महाराजांना शिकवली असे म्हणता येत नाही...आणि नंतर अवघ्या २ वर्षांत दादोजींचे निधन झाले.

आता या पार्श्वभुमीवर लेन हा किती महामुर्ख इतिहासकार (?) असेल आणि त्याला विक्रुत माहिती पुरवणारे बाबासाहेब पुरंदरे ते गजानन मेहेंदळे असे १३ हे सर्व वा त्यापैकी काहीजन किती मनोविक्रुत असतील आणि यापैकी कोणीही "शिवप्रेमी" म्हणुन घेण्याच्या लायकीचे कसे नाहीत हे आपले मस्तक आपल्याच धडावर आहे असे समजतात त्या सर्वांनी लक्षात घ्यावे.


१६२५: शहाजी राजांनी रंगो बापुजी धडफळे यांस पुणे, सुपे प्रांताचा कारभारी म्हणुन नेमले होते. ही जहागिरी शहाजी राजांकडॆ १६२४ साली आली. जर दादोजी आणि शहाजीराजांची पुर्वापार मैत्री असती दादोजी हेच शहाजी राजांचे पहीले कारभारी बनले असते. शहाजीराजे... तेंव्हा निजामशाहीत होते.

१६३०: मुरारीपंत जोगदेव या विजापुरच्या ब्राह्म्न सरदाराने पुण्यावर हल्ला केला आणि पुणे पुरेपुर उध्वस्त करुन त्यावरुन गाढवाचा नांगर फिरवला. अदिलशहा शाहाजी राजांचा द्वेष करत होता हे स्पष्ट होते, कारण शहाजी राजे निजामशाहेचे शासक सरदार बनले होते. पुणे वाचवण्यासाठी आदिलशहाचाच कारभारी असलेल्या दादोजींनी प्रयत्न न करणे स्वाभाविक होते.

त्याच वर्षी शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. हा किल्ला तेंव्हा निजामशाहीत होता व जिजावु गरोदर असतांनाच तेथे एका विवाहाप्रित्यर्थ आल्या होत्या.

१६३६: निजामशाहीचा अंत आणि शहाजी राजांना आदिलशाहेत जाणे भाग पडने. त्याच वर्षी आदिलशहाचाच कारभारी असलेल्या दादोजींना पुणे-सुपे प्रांताचे कारभारी पद दिले. यामागे एकच हेतु असु शकतो तो हा कि नवीन राजकीय समीकरणांशी जुळवुन घायला वेळ मिळावा आणि आदिलशहाचे नवे संकट नको. पण याच वेळेस शहाजी राजे बाल शिवाजी (६ वर्ष वय) आणि जिजावुंना सोबत विजापुरी घेवुन गेले.

थोडक्यात दादोजी आणि शहाजीराजांची पुर्वापार मैत्री असण्याची शक्यता नाही. शहाजी राजांचा जन्म १६०१ मद्धे झाला. दादोजींचा जन्म १५७५ मधील. निजमशाही आणि आदिलशाही यातुन विस्तव जात नव्हता. पुण्यावर मुरारपंतांनी रानटी हल्ला चढवुनही दादोजींना पुणे वाचावे असे वाटलेले दिसत नाही. (ते कोंडाण्याचे सुभेदार होते) आणि याच दादोजींनी त्याच गाढवाचा नांगर एका ब्राह्मणानेच फिरवला त्याच उध्वस्त नगरात स्व:प्रेरणेने सोण्याचा नांगर फिरवण्याचे सोपस्कार केले असतील हे पटत नाही. त्यांनी शाहाजीराजांची इछा आणि आदेश पाळले असेच फार तर म्हनता येते...कारण ही जहागिर भविष्यासाठी त्यांनी हर-प्रकारे राखुन ठेवली...तीच जहागिर त्यांनी आपल्या पहिल्या स्वतंत्र्य लढ्यासाठी वापरली...ती अनेकदा जप्त झाली असली तरी पुन्हा पुन्हा त्याच जहगिरिच्या सनदा मिळवल्या, जी जहागिर आदिलशहाच्या नोकराने उद्ध्वस्त केली तीच जहागिर त्यांनी आदिलशहाच्याच कारभार्याहस्ते पुन्हा उभारुन घेतली...आणि आपल्या पुत्राहस्ते तीच पुण्यभूमी पहिल्या स्वराज्यासाठी पुत्रा-हवाली केली. येथे मला शहाजी महाराजांच्या दुरद्रुष्टीचे, कर्तेपणाचे आणि त्यांच्या परकोटीच्या आत्मभानाचे आदर्श सर्वांनी घ्यायला हवे असे वाटते. हेच गुण शिवाजीमहाराजांत स्फुल्लिंगाप्रमाणे त्यांच्या जीवनभर तळपतांना दिसतात.

या पार्श्वभुमीवर अत्यंत खोटे बिनदिक्कत सांगणार्यांची कीव वाटते... जेथे प्रतिवाद संपतो तेथे "आता जुन्या गोष्टी कशाला उगाळायच्या?" असे काहिसे म्हणुन पळवाट काढली जाते, पण या जुन्या गोष्टॆए ज्यांनी विक्रुत करुन ठेवल्या आहेत, सत्य दडपले आहे-लपवले आहे-लपवण्याचा प्रयत्न होतो आहे त्यांचे काय करायचे? "माझा बाप कोण होता" हे यांनीच बिनदिक्कतपणे सांगायचे....मला माझाच बाप कोण होता या शोधमोहिमेवर पाठवुन द्यायचे...आणि सत्य समोर आले कि जुने कशाला उकरत बसता हे यांचेच आलाप ऐकायचे हा धंदा आता चालणार नाही. मग ते कोणेही असोत...मनोविक्रुतांना कोणत्याही समाजात स्थान नसते. ते नसावे..



Monday, October 4, 2010