Tuesday, October 26, 2010
दादोजींचा पुतळा आम्हीच काढू
दादोजींचा पुतळा आम्हीच काढू...!!!
25 Oct 2010, 0746 hrs IST
इतिहासातले वाद मिटविल्याशिवाय वर्तमानातले वाद मिटणार नाहीत. लाल महालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा शांततेने हलवला जाणार नसेल, तर आम्ही तो हलवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिला. संभाजी ब्रिगेड आणि भारत मुक्ती मोर्चातर्फे रविवारी संघर्ष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष प्रदीप ढोबळे, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, बामसेफचे अध्यक्ष वामन मेश्राम, सचिव व्ही. व्ही. जाधव, पुरुषोत्तम खेडेकर, मुफती मोहम्मद युसुफ, ब्रिगेडियर सुधीर सावंत आदी उपस्थित होते. समाजात शांतता हवी असेल तर विकृत इतिहास नको. आंदोलन जसे दादोजी कोंडदेव यांच्या विरोधात आहे, तसेच ते इतिहास विकृत करणाऱ्यांच्या विरोधात असल्याचे गायकवाड यांनी नमूद केले. आजपर्यंत शांततेने पुतळा हलवण्याची मागणी आम्ही केली आहे. मात्र आता तो हलवला गेला नाही, तर आमचे कार्यकर्ते हलवल्याशिवाय राहणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बहुजन समाजाचा आजवर घातच केला आहे. जेम्स लेन प्रकरणातही सुप्रीम कोर्टात सरकारने चांगले वकील न पाठवल्याने निकाल विरोधात गेला. भांडारकर इन्स्टिट्यूटमधल्या अभ्यासकांनी लेनला मदत केल्यामुळे त्यांच्यावरही खटले भरण्याची मागणी त्यांनी केली. आपला खरा शत्रू कोण ते बहुजन समाजानाने ओळखण्याची गरज असल्याचे सावंत म्हणाले.
25 Oct 2010, 0746 hrs IST
इतिहासातले वाद मिटविल्याशिवाय वर्तमानातले वाद मिटणार नाहीत. लाल महालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा शांततेने हलवला जाणार नसेल, तर आम्ही तो हलवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिला. संभाजी ब्रिगेड आणि भारत मुक्ती मोर्चातर्फे रविवारी संघर्ष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष प्रदीप ढोबळे, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, बामसेफचे अध्यक्ष वामन मेश्राम, सचिव व्ही. व्ही. जाधव, पुरुषोत्तम खेडेकर, मुफती मोहम्मद युसुफ, ब्रिगेडियर सुधीर सावंत आदी उपस्थित होते. समाजात शांतता हवी असेल तर विकृत इतिहास नको. आंदोलन जसे दादोजी कोंडदेव यांच्या विरोधात आहे, तसेच ते इतिहास विकृत करणाऱ्यांच्या विरोधात असल्याचे गायकवाड यांनी नमूद केले. आजपर्यंत शांततेने पुतळा हलवण्याची मागणी आम्ही केली आहे. मात्र आता तो हलवला गेला नाही, तर आमचे कार्यकर्ते हलवल्याशिवाय राहणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बहुजन समाजाचा आजवर घातच केला आहे. जेम्स लेन प्रकरणातही सुप्रीम कोर्टात सरकारने चांगले वकील न पाठवल्याने निकाल विरोधात गेला. भांडारकर इन्स्टिट्यूटमधल्या अभ्यासकांनी लेनला मदत केल्यामुळे त्यांच्यावरही खटले भरण्याची मागणी त्यांनी केली. आपला खरा शत्रू कोण ते बहुजन समाजानाने ओळखण्याची गरज असल्याचे सावंत म्हणाले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment