Tuesday, December 28, 2010

आनंदोत्सव .....



Dadoji Was Not Teacher Of Shivaji Maharaj - Historian Imran Habib...
दादोजी गुरू नव्हते : इमरान हबीब

Imran habib spoke to Star Majha On Dadoji Konddev Issue..saying dadoji was not a teacher of shivaji ..corporation has removed statue of dadoji..which is justice to shivaji's history...
महाराष्ट्रभरात शिवप्रेमिचा जल्लोष ....पेढे वाटून,फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा..
दादोजी कोंडदेव पुतळा हटविल्याची बातमी वृत्तवाहिन्यांवरून येताच महाराष्ट्रभरात जल्लोष सुरु झाला.. ठिकठिकाणी पेढे वाटून,फटाके फोडून शिवप्रेमी आनंद व्यक्त करत होते... पुणे,मुंबई,कोल्हापूर,सातारा,सांगली,औरंगाबाद,बुलढाणा,चंदपूर,नांदेड,नागपूर,यवतमाळ,उस्मानाबाद ह्या भागात मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला..विशेष म्हणजे मराठवाड,खानदेश आणि विदर्भाच्या ग्रामीण भागातही प्रचंड उत्साह दिसून येत होता.. शिवसेनेने ह्या निर्णयाच्या विरोधात भूमिका घेवूनही पुणे आणि औरंगाबाद येथे तुरळक घटना वगळता कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही..वेगवेगळ्या संघटना,राजकीय पक्ष आणि साहित्यिक ह्यांनी ह्या निर्णयाबद्दल भरभरून प्रतीक्रिया दिल्या आहेत..

दादोजी समर्थकांच्या बंदला प्रतिसादच नाही...पुणे सुरळीत...दादोजी समर्थक नाराज..

दादोजी समर्थकांच्या बंदला प्रतिसादच नाही...पुणे सुरळीत...दादोजी समर्थक नाराज..
पुण्याच्या लालमहलातुन दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्यात आला. या प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेनेने पुकारलेल्या पुणे बंदला अतिशय कमी प्रतिसाद मिळला आहे. पुण्यातले शाळा कॉलेजेस व्यवस्थित सुरु आहेत. तसेच बस सेवा आणि रिक्षाही सुरू आहेत. सकाळी पुण्यातल्या काही भागात बसेसवर दगडफेक करण्यात आली. जवळपास बसेस फोडण्यात आल्या.अनेक भागात दुकान सुरू आहेत. पीएमटी सेवाही सुरळीत सुरु आहे.पुण्याच्या सदैव गर्दी असणार्‍या लक्ष्मी रोडवरची अनेक दुकान सुरु आहेत. इतर ठिकाणच्या बाजारपेठ चालु आहे. एकंदर शिवसेनेच्या बंदला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला दिसत नाही..."पुतळा हलविला बरे झाले.." असा सामान्य जनतेचा सूर होता..त्याच बरोबर काही दादोजी समर्थकांच्या फुसक्या आंदोलनाचा निषेधही होत आहे..

Monday, December 27, 2010

दादोजींचा पुतळा काढला!

दादोजींचा पुतळा काढला!

पुण्यातील लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मध्यरात्री दोन वाजता हटवण्यात आला. पुणे महानगपालिका आणि पोलिसांनी ही कारवाई केली. त्या मुळे महाराष्ट्रभरातील शिवप्रेमी जनतेत आनंदाची लाट उसळली आहे..

मध्यरात्री दोन वाजता दादोजींचा पुतळा कटरच्या सहाय्याने कापला गेला आणि एका टेम्पोत टाकून अज्ञात स्थळी नेण्यात आला. त्याआधी शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱहे यांच्यासह पुतळ्याच्या समर्थनासाठी जमलेल्या सेना-भाजप 40 कार्यकर्त्यांना ताब्यातही घेण्यात आले होते. नंतर त्यांना सोडण्यात आले.

दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्यासाठी माजी न्यायमूर्ती पी बी सावंत ,बी.जी.कोळसे-पाटीलसह यांच्या शिवप्रेमी जनजागृती समिती,शिवसंग्राम,छावा,बामसेफ,समता परिषद भारत मुक्ती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेडने आंदोलन केले होते.ह्या आंदोलनाला महाराष्ट्रातील ८३ सामाजिक संघटना आणि 7 राजकीय पक्षांचा पाठिंबा होता ...


Saturday, December 25, 2010

दादोजी कोंडदेव स्टेडियम नामांतराचा प्रस्ताव
26 Dec 2010, 0059 hrs IST

' दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, हा इतिहास राज्य सरकारनेही मान्य केला आहे. कोंडदेव हे नाटकातील पात्र मनुवाद्यांनी इतिहासाचे विदुपीकरण करून शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आणले', असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जीतेंद आव्हाड यांनी केला. 'हा खोटा इतिहास बदलण्याची गरज असून ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमचे नाव बदलण्याचा प्रस्ताव काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी ठाणे महापालिकेच्या पुढील महासभेत आणणार आहे', असे त्यांनी सांगितले.

Friday, December 24, 2010

संमेलन स्थळी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

संमेलन स्थळी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
ठाण्यात होत असलेल्या 84 वे साहित्य संमेलन बंद पाडू असा इशारा दिलेल्या संभाजी ब्रिगेडने ग्रंथ दिंडी निघण्या अगोदरदादोजी कोंडदेव स्टेडियमबाहेर आंदोलन केले. यावेळी स्टेडियमबाहेर शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दादोजी कोंडदेव स्टेडियमबाहेर प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाचा फलक लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. यावरून शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी 18 लोकांना ताब्यात घेतलं आहे.

Thursday, December 23, 2010

"दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत व दादोजींचे उदात्तीकरण ह्यापुढे होणार नाही"...असा ठराव संमेलनात करता येवू शकतो - चर्चेतील तोडगा.

स्टेडीयमचे नाव बदलून प्रबोधनकार ठाकरे स्टेडीयम करणार.... संमेलनात ठराव करावेत..अन्यथा संमेलन उधळू..- संभाजी ब्रिगेड

काल रात्री ९:४५ ला झालेल्या आय.बी.एन. लोकमत वाहिनीवरील "आजचा सवाल" ह्या कार्यक्रमाचा विषय "'दादोजी कोंडदेव' नावाचा वाद साहित्य संमेलनात आणणं योग्य आहे का ?" असा होता..ह्या चर्चेत साहित्य संमेलनाचे संयोजक दा.कृ.सोमण, पत्रकार विजय चोरमारे शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे, संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड सहभागी झाले होते.
ह्या कार्यक्रमात बोलताना संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड म्हणाले कि..दादोजींचे नाव इतिहासाच्या पुस्तकातून वगळले आहे..दादोजी कोंडदेव नावाचा क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार बंद करण्यात आला आहे..लाल महालातील दादोजींचा पुतळाही काढला जाणार आहे..
ठाणे येथे असलेल्या दादोजी कोंडदेव स्टेडीयमचे नाव बदल हि आमची २००४ पासूनची मागणी आहे..त्या संदर्भात आम्ही महानगर पालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत..पण महानगर पालिका त्याची दाखल घेत नसल्याने व दादोजींचे उदात्तीकरण हे कथा ,कादंबर्या अश्या साहित्यामधून झाल्यामुळे साहित्यिकांनी ह्या गोष्टीची काळजी घ्यावी...हे सांगण्यासाठी हे संमेलन उधळून लावणार असल्याचे त्यांनी सांगितले..

दा.कृ.सोमण ह्यांनी संमेलन उधळू नये अशी विनंती करत हा प्रश्न महापालिकेचा असल्याचे सांगितले..त्यामुळे आपल्या हाती काही नसल्याचे सांगतानाच त्यावर साहित्यिक विश्वात चर्चा घडवून आणू शकतो असे आश्वासन दिले..
"दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत व दादोजींचे उदात्तीकरण ह्या पुढे होणार नाही"...असा ठराव साहित्य संमेलनात करता येवू शकतो.....साहित्य महामंडळाने ह्या साठी पुढाकार घ्यावा..अशी सूचनाही जेष्ठ पत्रकार विजय चोरमारे ह्यांनी दिली..महाराष्ट्र शासनाने असा अहवाल दिला असल्याने हे सहज शक्य असल्याचेही ते म्हणाले .

शिवाय महाराष्ट्रातील ७८% जनतेनेही पोलच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडच्या मागणीला पाठींबा दिला ..

ठाण्यात शुक्रवारपासून होणाऱ्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘दादोजी कोंडदेव’ हा आता वादाचा मुद्दा ठरल्याने साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच पोलीस बंदोबस्तासह खाजगी सुरक्षा यंत्रणाही तैनात होणार आहे. हे साहित्य संमेलन जिथे भरणार आहे त्या ‘दादोजी कोंडदेव स्टेडियम’चे नाव बदलावे अन्यथा संमेलन होऊ देणार नाही, असा इशारा ‘संभाजी ब्रिगेड’ या संघटनेने दिला आहे. पुण्यातील लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलविण्याचा निर्णय महापालिकेत गुरुवारी बहुमताने संमत झाल्यानंतर ‘ब्रिगेड’चा जोर वाढल्याने हे साहित्य संमेलन झाकोळले आहे.संमेलनाचे कार्यवाह विदयाधर ठाणेकर यांनी संमेलनासाठी पोलिस बंदोबस्त असून संमेलन सुरळित संपन्न व्हावे यासाठी महाविदयालयीन युवकांच्या स्वयंसेवकांसह खाजगी सुरक्षारक्षकही ठेवण्यात आल्याचे सांगितले. ८४ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्त्तम कांबळे यांनी मात्र पुण्यातील घटनेसंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. संभाजी बिग्रेडने साहित्य संमेलनात आपले राजकारण आणू नये. स्टेडियमचे हे नाव आजच देण्यात आलेले नाही. ते फार पूर्वीचे आहे. त्यामुळे बिग्रेडने आपला पराक्रम राज्य शासनाच्या शालेय धोरणावर दाखवावा. असे त्यांनी सांगितले.
आयबीएन-लोकमत वाहिनीवरील एका चर्चासत्रात संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मात्र दादोजी कोंडदेव स्टेडियमचे नाव उद्याच आमचे कार्यकर्ते बदलतील आणि त्याला प्रबोधनकार ठाकरे यांचे नाव देतील, असे जाहीर केले.

शिवइतिहासातून दादोजी कोंडदेव हटणार ...

अखेर यश..लाल महलातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवणार

अखेर यश..लाल महलातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवणार..
23 डिसेंबर

पुण्यातल्या ऐतिहासिक लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा अखेर हलवला जाणार आहे. पुण्याच्या लालमहालात असलेला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्याचा ठराव पुणे महानगरपालिकेने मंजूर केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचा या ठरावाला पाठिंबा दिला आहे. 54 विरुध्द 37 मतानी ठराव पारित करण्यात आला. या ठरावाला मनसेनं मात्र तटस्थ भुमिका घेतली. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्यात यावा अशी संभाजी ब्रिगेडची मागणी होती यासंदर्भात आज पर्यंत अनेक आंदोलन करण्यात आली.

दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलवण्यासाठी 25 ऑगस्ट 2010 रोजी लोकशासन आंदोलन समितीच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन माजी न्यामूर्ती पी.बी.सावंत आणि बी.जी. कोळसे- पाटील यांच्या नेतृत्वखाली करण्यात आले होते. यावेळी महापौर मोहनसिंग राजपाल यांनी लालमहालाच्या ठिकाणी जाऊन दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्याची घोषणा केली होती. मात्र दूसर्‍यादिवशी महानगरपालिकेत सर्वपक्षीय बैठक घेऊन लाल महालातून दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होती.

महानगरपालिकेत सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यासाठी आपण एक समिती नेमू आणि या समितीच्या अहवालानंतर यावर कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आले होते. महापालिकेच्या या निर्णयानंतर संतापलेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी महापौरांच्या दालनाबाहेर सुरक्षारक्षकास धक्काबुक्की केली होती.


लालमहालातील दादोजी कोंडदेव यांचे शिल्प हटविणार
-
Thursday, December 23, 2010 AT 06:40 PM (IST)

पुणे - लालमहालातील दादोजी कोंडदेव यांचे शिल्प हटवून त्याच्या जागी शहाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज (गुरुवार) घेण्यात आला.

लाल महालात बाल शिवाजी सोन्याच्या नांगराने पुण्याची भूमी नांगरित असल्याचे समूह शिल्प काही वर्षांपूर्वी उभारण्यात आले आहे. त्यामध्ये दादोजी कोंडदेव यांचे शिल्पही उभारण्यात आले आहे. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढून टाकण्याबाबत पुण्यातील संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना गेल्या अनेक वर्षांपासून आग्रही होत्या. त्या पार्श्‍वभूमीवरच हा निर्णय घेण्यात आला असावा.


Wednesday, December 22, 2010

जाणता राजा या महानाट्याच्या निर्मात्यांनी संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांपुढे माघार घेतली

जाणता राजा या महानाट्याच्या निर्मात्यांनी संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांपुढे माघार घेतली
संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपानंतर जाणता राजाच्या नव्या प्रयोगात दादोजी कोंडदेवांचे महत्व कमी करण्यात आलं. तसेच गागाभट्टांच्या तोंडचे एक वाक्य ही वगळण्यात आलं. आणि त्यात संभाजी ब्रिगेडला यश येतं असल्याचे दिसतं आहे. आपल्या आक्षेपानंतर नव्या प्रयोगांमध्ये दुरुस्त्या करण्यात येतात की नाही हे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी कालचा प्रयोग पाहून खात्री करुन घेतली. पण अजूनही संभाजी ब्रिगेडचे सर्व आक्षेप मान्य करण्यात आलेले नसल्याचे सांगण्यात आलं. 15 दिवसांत सुधारणा केल्या नाहीतर बाबासाहेब पुरंदरेंच्या घरापुढे आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला.

संभाजी ब्रिगेडच्या आक्षेप

- महानाट्यात दादोजी कोंडदेवांचे उदात्तीकरण नको
- शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी गागाभट्टांच्या तोंडी असलेले एक वाक्य वगळा
- राज्याभिषेक सोहळा सुरू असताना समर्थ रामदास सोहळा थांबवून जय जय रघुवीर समर्थचा घोष करतात
- नव्या प्रयोगात हा प्रसंग मात्र कायम आहे

जाणता राजामध्ये राज्यभिषेकाच्यावेळी गागाभट्टांच्या तोडी एक वाक्य आहे त्यात गागाभट्ट म्हणतात की, "महाराज आपण छत्रपती झाला आहात. परंतु आपण धर्मविरोधी कृत्य केल्यास धर्म-मार्तंड हा धर्मदंड आपल्या मस्तकी मारतील" संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपानंतर हे वाक्य वगळण्यात आलं.

पुरंदरे यांच्या घरासमोर आंदोलन करणार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'जाणता राजा' या महानाट्यातील काही आक्षेपार्ह विधाने काढून टाकण्याच्या मागणीसाठी महानाट्याचे निर्माते बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरासमोर उग्र आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.

पुण्यात शिवसाई प्रतिष्ठानने 'जाणता राजा'चे प्रयोग ठेवले आहेत. महानाट्यात दादोजी कोंडदेव व रामदास स्वामी यांचे उदात्तीकरण केल्याचा आरोप करीत संभाजी ब्रिगेडने हे प्रयोग उधळून लावण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर महानाट्यातून दादोजी व रामदास स्वामी यांच्यावर आधारित काही भाग वगळण्यात आला. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल, अशी विधाने महानाट्यातून काढली गेली नाहीत, असा संभाजी ब्रिगेडचा आक्षेप आहे. महानाट्यातील शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यात गागाभट्ट यांच्या मुखी काही अवमानकारक विधाने घालण्यात आली आहेत. ही विधाने वगळण्यासाठी नाटकाचे निर्माते पुरंदरे यांच्या घरासमोर पंधरा दिवसांनी उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष शांताराम कुंजीर, सरचिटणीस संतोष शिंदे, मराठा महासभेचे अध्यक्ष जगजीवन काळे, शिवराज्य प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अक्षय आहेर यांनी दिला.

संभाजी ब्रिगेडने आंदोलन करू नये..शिवसेना.

ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमचे नाव महानगरपालिकेने बदलावे नाहीतर संमेलन होऊ देणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला होता. त्यावर संमेलनाचा या वादाशी काही संबंध नसून संभाजी ब्रिगेडने असं आंदोलन करु नये असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. दरम्यान शिवसेनेने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात "मराठा" आमदार एकनाथ शिंदेना पाठवले असल्याने ठाणे येथे शिवसेनेच्या खेळीचे कौतुक होत होते..
दरम्यान हा महानगरपालिकेचा विषय असल्याने त्यावर त्यांनीच निर्णय घ्यावा असे मत वसंत डावखरे यांनी व्यक्त केले.

ठाण्यातल्या साहित्य संमेलन संयोजकांनी मागितले तर संरक्षण पुरवू असं सांगतानाच आंदोलकांनी तोडफोड करू नये लोकशाही मार्गाने मागण्या मांडाव्यात असं प्रतिपादन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी संभाजी ब्रिगेडच्या दादोजी कोंडदेव स्टेडीयमचे नाव बदलण्याच्या मागणीबाबत काल केले होते.

Tuesday, December 21, 2010

ठाणे येथील दादोजी कोंडदेव स्टेडीयमचे नाव बदला..संभाजी ब्रिगेडची मागणी..

मराठी साहित्य संमेलन उधळण्याचा संभाजी ब्रिगेडचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
Monday, December 20, 2010 AT 12:00 AM (IST)

ठाणे - दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहाचे नाव न बदलल्यास ठाण्यात होणारे मराठी साहित्य संमेलन उधळण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे ठाणे जिल्हा अध्यक्ष जनार्दन चव्हाण यांनी दिला आहे. त्यासाठी उग्र आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात 24 संघटनांचा सहभाग असणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

शासकीय विश्रामगृहात जनार्दन चव्हाण यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत संमेलन उधळण्याचा इशारा दिला. दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू नसल्याचा पुरावा आम्ही सादर केला आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने वारंवार दादोजी कोंडदेव यांच्या नावाने असलेल्या क्रीडा प्रेक्षागृहाचा उल्लेख होत आहे. यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. या विषयावर ठाण्याचे महापौर अशोक वैती यांना पत्र दिले होते. तसेच जिल्हाधिकारी आबासाहेब जऱ्हाड यांनाही पत्र देऊन दादोजी कोंडदेवांच्या नावाने असलेल्या क्रीडाप्रेक्षागृहात संमेलन घेण्यास विरोध असल्याचे कळविले होते. त्यावेळी चर्चेला बोलावण्याऐवजी मला कारवाईची नोटीस बजावण्यात आली, पण माझ्यावर कारवाई झाली तरी मी आंदोलन मागे घेणार नाही. मराठी साहित्य संमेलनाला आमचा विरोध नाही. केवळ कार्यक्रमाच्या स्थळाच्या नावाला आक्षेप आहे. आमच्या विरोधाची दखल न घेतल्यास कोणत्याही क्षणी संभाजी ब्रिगेडतर्फे दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहाच्या नावावर दुसरे नाव लावण्याचा इशारा जनार्दन चव्हाण यांनी दिला आहे.

ठाण्यातल्या साहित्य संमेलन संयोजकांनी मागितलं तर संरक्षण पुरवू तसेच आंदोलकांनी तोडफोड करू नये लोकशाही मार्गाने मागण्या मांडाव्यात असं प्रतिपादन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी संभाजी ब्रिगेडच्या दादोजी कोंडदेव स्टेडीयमचे नाव बदलण्याच्या मागणीबाबत केले.


पुणे येथील जाणता राजा हे महानाट्य उधळून लावणार -संभाजी ब्रिगेड

बाबासाहेब पुरंदरे लिखित जाणता राजा हे महानाट्य पुण्यात होत असून ते उधळून लावण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे..बाबासाहेब पुरंदरे ह्यांनी जेम्स लेन ला मदत केल्याचा आरोप गेल्या काही वर्षात अनेक संघटनानी केला आहे.त्या पार्श्वभूमीवर पुरंदरे हे रामदास आणि दादोजी कोंडदेव ह्यांचे उदात्तीकरण करत असल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेड व अन्य संघटना आक्रमक झाल्या आहेत

दादोजी कोंडदेव स्टेडीयमचे नाव बदला अन्यथा संमेलन उधळून लावू असा इशारा संभाजी ब्रिगेडने काही दिवसांपूर्वी केला होता. आर. आर. पाटील यांनी सावध भूमिका घेत वाद टाळण्याचा सल्ला दिला मात्र जाणता राजा यां महानाट्यातील दादोजी कोंडदेव आणि रामदास यांच्या व्यक्तीरेखा वगळा अन्यथा प्रयोग होऊ देणार नाही याबाबतच्या प्रश्नावर भाष्य करणं आबांनी टाळलं.

Saturday, October 30, 2010

B.G.Kolse Patil's Letter to Mayor.Remove Dadoji Konddev Statue Before 10th November 2010

Justice B.G.Kolse Patil Warns Pune Municipal Corporation to Remove Dadoji Konddev Statue From Lal Mahal Before 10th November 2010 otherwise Lokshasan Aandolan,sambhaji Brigade will Remove That Statue From lala mahal...He also send a Letter to Mayor of Pune MNC Demandin Removal Of Statue.

Thursday, October 28, 2010

वेळकाढूपणामुळे संभाजी ब्रिगेडचा दादोजी कोंडदेव समितीला विरोध...



महाराष्ट्र शासनाने ह्या पूर्वी ह्या प्रकरणी एक समिती नेमली होती..दादोजी कोंडदेव गुरु नसल्याचा निर्वाळा त्या समितीने दिला होता..तो निर्णय मान्य केला गेल्यामुळे नवी समिती नेमण्याची गरजच काय..?? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे..

इतिहासातील बनावटीकरणावर महात्मा फुलेंचे विचार..

गोब्राह्मनासह दादोजी कोंडदेवास फाजील आगन्तुकी करावयास लावल्यामुळे तसल्या बनावट पवाड्यांचा मी संचय केला नाही. - महात्मा फुले.

महात्मा फुलेंनी इतिहासातील घुसखोरी बद्दल, आगन्तुकी करणाबद्दल , बनावटी करणा बद्दल एका पत्रात उल्लेख केलेला आहे...
मामा परमानंद यांस पत्र.....................
------------- मुक्काम पुणे त|| २ माहे जून १८८६ ई||
.........राजमान्य राजेश्री नारायणराव माधवराव परमानंद मु|| आंबेर
......................... साष्टांग नमस्कार वि.वि. आपले त|| ३० माहे गुदस्तचे कृपापात्र पावले. त्याचप्रे|| पुण्याचे हायस्कुलातील भागवतमास्तर यांनी शंकर तुकाराम यांनी छापलेला पवाडयाचे पुस्तकातील काही शाहिरांची एक याद मजला आणून दिली, यावरून मी त्यास येक वेळी कळवले कि, सदरचे पवाडयाची प्रत मजजवळ नाही आणि ती पाहिल्याशिवाय मला याविषयी काही कळविता येत नाही. नंतर त्यांनी ते पुस्तक मला आणून दिले नाही. सबब त्याविषयी मला काही आपल्यास लिहून कळविता आले नाही.
..................... फितुरी गोपिनाथपंताचे साह्याने शिवाजीने दगा करून अफजुलखानाचा (वध?) केला. तान्हाजी मालूसऱ्याने घोरापाडीचे साह्याने सिंहगड किल्ला काबीज केला व शिवाजीने पुण्यात दरोडा घालून मुसलमान लोकांस कापून काढले. या सर्वाच्या कच्च्या हकीकतीचे खरे पोवाडे माझे पाहण्यात आले नाहीत. आज दिनपावेतो युरोपियन लोकांनी जे काही इतिहास तयार केले आहेत , ते सर्व क्षुद्र आणि अतिक्षुद्रांची वास्तविक स्थिती ताडून न पाहता +++ झाकून आर्यं भटब्राह्मणांचे ग्रंथावर व भटकामगारांचे सांगण्यावर भरवसा ठेऊन इतिहास तयार केले आहेत. व अलीकडे भटब्राह्मणांची विद्वान पोरेसोरे नवीन पवाडे करून हळूच मैदानात आणीत आहेत. त्यापैकी माझे पाहण्यातही बरेच आले आहेत आणि त्यातील क्षुद्रानी कमावलेल्या मोत्यापोवळ्यांचा चारा चरणारे भागवती, गोब्राह्मनासह दादोजी कोंडदेवास फाजील आगन्तुकी करावयास लावल्यामुळे तसल्या बनावट पवाड्यांचा मी संचय केला नाही.
.........आठ वर्षी जेव्हा मी मुंबईत आपले घरी भेटावयास आलो होतो, तेव्हा पांचगणीचे पाटील रामपासमक्ष आपल्यास क्षुद्र शेतकऱ्यांचे दैन्यवाण्या स्थितीचा काही देखावा जगापुढे आणणार, म्हणून कबूल केले होते. ते त्या देखाव्याचे असूड या नावाचे तीन वर्षापूर्वी एक पुस्तक तयार केले होते व त्याची एकेक प्रत आपले कलकत्याचे हरभास व अष्टपैलू गवरनर जनरल (साहेब?) श्रीमान महाराज बडोद्याचे गायकवाड सरकारास पाठविल्या आहेत. आमच्या क्षुद्रांत भेकडबाहुले छापखानेवाले असल्यामुळे ते पुस्तक छापून काढण्याचे काम तूर्त एके बाजूला ठेविले आहे. असुडाची प्रत आपल्यास पाहण्याकरिता पाहिजे त्याप्रमाणे लिहून आल्याबरोबर त्याची नकळ करण्यास लेखक बसवितो. नकल होण्यास सुमारे एकदोन महिने लागतील असा अदमास आहे. कळावे लोभ असावा हे विनंती.


------------------------------- आपला ---------
.........................................................................जोतीराव गोविंदरावफुले.


दूसरा भ्याला मेला बेत नव्हता पुर्वीचा .
दादोजी कोडदेवाचा.
मासा पाणी खेले गुरु कोण असे त्याचा...???

संदर्भ------- महात्मा फुले समग्र वांग्मय

thanks to http://ramadasswami.blogspot.com/

Tuesday, October 26, 2010

दादोजींचा पुतळा आम्हीच काढू

दादोजींचा पुतळा आम्हीच काढू...!!!




25 Oct 2010, 0746 hrs IST

इतिहासातले वाद मिटविल्याशिवाय वर्तमानातले वाद मिटणार नाहीत. लाल महालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा शांततेने हलवला जाणार नसेल, तर आम्ही तो हलवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिला. संभाजी ब्रिगेड आणि भारत मुक्ती मोर्चातर्फे रविवारी संघर्ष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष प्रदीप ढोबळे, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, बामसेफचे अध्यक्ष वामन मेश्राम, सचिव व्ही. व्ही. जाधव, पुरुषोत्तम खेडेकर, मुफती मोहम्मद युसुफ, ब्रिगेडियर सुधीर सावंत आदी उपस्थित होते. समाजात शांतता हवी असेल तर विकृत इतिहास नको. आंदोलन जसे दादोजी कोंडदेव यांच्या विरोधात आहे, तसेच ते इतिहास विकृत करणाऱ्यांच्या विरोधात असल्याचे गायकवाड यांनी नमूद केले. आजपर्यंत शांततेने पुतळा हलवण्याची मागणी आम्ही केली आहे. मात्र आता तो हलवला गेला नाही, तर आमचे कार्यकर्ते हलवल्याशिवाय राहणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बहुजन समाजाचा आजवर घातच केला आहे. जेम्स लेन प्रकरणातही सुप्रीम कोर्टात सरकारने चांगले वकील न पाठवल्याने निकाल विरोधात गेला. भांडारकर इन्स्टिट्यूटमधल्या अभ्यासकांनी लेनला मदत केल्यामुळे त्यांच्यावरही खटले भरण्याची मागणी त्यांनी केली. आपला खरा शत्रू कोण ते बहुजन समाजानाने ओळखण्याची गरज असल्याचे सावंत म्हणाले.

Monday, October 25, 2010

Sambhaji Brigade And Bharat Mukti Morcha





दादोजी कोंडदेव यांचा पुतळा 31 डिसेंबरपूर्वी हलविण्यात यावा



पुणे - या वेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड म्हणाले, ""महाराष्ट्रात शांतता हवी असेल तर लाल महालातील कोंडदेवांचा पुतळा तातडीने काढून टाकावा लागेल तसेच जेम्स लेनच्या पुस्तकाबाबत तातडीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी लागेल.''
भारत मुक्ती मोर्चा व संभाजी ब्रिगेड यांनी आयोजित केलेल्या संघर्ष मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी झालेल्या सभेत आठ ठराव करण्यात मंजूर करण्यात आले. लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा 31 डिसेंबरपूर्वी हलविण्याबरोबरच जेम्स लेनच्या पुस्तकाबाबत सर्वोच्च न्यायालयात तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी, या प्रमुख ठरावांचा यात समावेश आहे.
"ज्या हिंदू धर्माच्या नावाने अभिमानाने गळे काढले जात आहेत. मात्र, असा कोणताही धर्म पुरातन काळापासून अस्तित्वात नाही. हिंदू हा आक्रमक मुघलांनी येथील जनतेविषयी वापरलेला अवमानकारक शब्द आहे, चातुर्वर्णाचा पुरस्कार करणाऱ्या उच्च वर्णियांनी बहुजन समाजाला फसविण्यासाठी हिंदू या शब्दाला धर्माचे स्वरूप प्राप्त करून दिले. बहुजनांनी यापासून दूर राहिले पाहिजे'', असे मत "बामसेफ'चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी रविवारी येथे व्यक्त केले. लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा 31 डिसेंबरपूर्वी हलविण्यात यावा, असा ठराव या वेळी करण्यात आला.
ब्रिगेडियर सुधीर सावंत, प्रा. प्रदीप सोळंके, प्रा. प्रदीप ढोबळे, मुफ्ती महंमद सय्यद, प्रा. श्रीमंत कोकाटे, व्ही. डी. गायकवाड, पाटील यांची या वेळी भाषणे झाली. ब्रिगेडचे कार्याध्यक्ष शांताराम कुंजीर यांनी ठरावांचे वाचन केले. विकास पासलकर, रमेश राक्षे यांच्यासह अनेक पदाधिकारी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

Friday, October 22, 2010

संभाजी ब्रिगेड – भारत मुक्ती मोर्चा संयुक्त संघर्ष मेळावा… संभाजी ब्रिगेड – भारत मुक्ती मोर्चा संयुक्त संघर्ष मेळावा

संभाजी ब्रिगेड – भारत मुक्ती मोर्चा संयुक्त संघर्ष मेळावा…

संभाजी ब्रिगेड – भारत मुक्ती मोर्चा संयुक्त संघर्ष मेळावा…
महापुरुषांच्या सन्मानात, आम्ही उतरलो मैदानात…

दि.२४ ऑक्टोंबर २०१०, वेळ दु.३ वाजता…
स्थळ- एस.एस.पी.एम.एस. ग्राउंड, पुणे RTO शेजारी, पुणे…

Tuesday, October 19, 2010

२४ ऑक्टोबर ऐतिहासिक दिन ठरणार .... भारत मुक्ती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेड च्या मेळाव्यास जगभरातून प्रतिसाद

२४ ऑक्टोबर ऐतिहासिक दिन ठरणार ....
भारत मुक्ती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेड च्या मेळाव्यास जगभरातून प्रतिसाद

read todays mulnivasi nayak

www.mulnivasinayak.com

Monday, October 18, 2010

दादोजी कोंड्देवाचा पुतला हट्वलाच पाहिजे
शिवप्रेमी जनजागरण समिती

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे आणि प्रा. प्रतिमा परदेशी यांची भाषणे होणार आहेत
स्थळ: आचार्य अत्रे नाट्यगृह , संत तुकाराम नगर, वाय सी एम जवळ, पिंपरी-चिंचवड।

वेळ: गुरूवार दि. २१ आक्टोबर २०१० दुपारी ४ वाजता.

Wednesday, October 13, 2010

बहुजन समाज जागृत झाला असून अजूनही हा पुतळा हाटवला नाही तर तीव्र आंदोलन..

वास्तवाचा शोध घेऊन इतिहास समाजासमोर मांडावा
(Updated on 11/10/2010 0 : 19 IST)

लातूर (प्रतिनिधी) : इतिहासचे विकृत पद्धतीने लेखन केले जात आहे व त्यातून राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारख्या महापुरुषांचे चारित्र्य मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तवाचा शोध घेऊन इतिहास
समाजासमोर मांडावा, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे राज्य कार्यकारिणी चिटणीस प्रा. एस. व्ही. जाधव यांनी केले.
पत्रकार भवन येथे आयोजित दादोजी कोंडदेव हटाव परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र अध्यक्ष अ‍ॅड. गौतम भालेराव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. एस. व्ही. जाधव, प्रा. माधव गादेकर, कॉ. मुर्गप्पा खुमसे, शेकापचे राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण गोळेगावकर, प्रा. अर्जून जाधव, डॉ. श्रीराम गुंंदेकर, जमाअत-ए-इस्लामीचे इक्राम शेख, के. ई. हरिदास आदी मान्यवर उपस्थित होेते.
या वेळी पुढे बोलताना जाधव म्हणाले
दादोजी गोंडदेव कारकून म्हणून शिवरायाच्या काळात कार्यरत असताना त्यांचा इतिहासात गुरु असा उल्लेख आहे. क्रीडा क्षेत्रांशी त्यांचा काहीही संबंध नसताना दादोजी कोंडदेव क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. खरा इतिहास समोर येताच हा प्रकार बंद करण्यात आला व पुणे महानगरपालिकेच्या वतीने लाल महालात दादोजी कोंडदेवाचा पुतळा उभारण्यात आले याला प्रारंभी विरोधही करण्यात आला व विरूनही गेला. पण पुन्हा बहुजन समाज जागृत झाला असून अजूनही हा पुतळा हाटवला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
अध्यक्षीय समारोपात बोलताना अ‍ॅड. भालेराव म्हणाले की, आज गरज आहे. इतिहासाच्या तत्वज्ञानाची लिहलेल्या इतिहासातून चिकित्सा होऊन वास्तवाचा शोध घेऊन खरा इतिहास समाजासमोर मांडावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले. कोंडदेव हटाव परिषदेत कॉ. मुर्गाप्पा खुमसे, भाई लक्ष्मण गोळेगावकर, प्रा. अर्जून जाधव, प्रा. श्रीराम गुंदेकर आदी मान्यवरांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी लिखित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. श्रीराम गुंदेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय जाधव यांनी केले तर आभार प्रा. पाटील यांनी मानले कार्यक्रमाला उपप्राचार्य उद्धव कोळपे, अ‍ॅड. उदय गवारे, प्रा. राजीव ढवळे, प्रा. किरण बिडवे, सतीश जाधव, दत्ता भोसले, सी. एस. माळी, प्रा. उत्तमराव जाधव, राजकुमार जाधव, समाधान शिंदे, दगडू गव्हाणे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

"दादोजी कोंडदेवाचे इतिहासातील स्थान" - भास्कर धाटावकर

नवीन शिवइतिहास संशोधन ग्रंथ - "शिवचरित्रातील कल्पना आणि वास्तव ह्यांच्या सीमेवर"..-भास्कर धाटावकर. किंमत १५० रुपये,प्रकाशन - जून २०१०
"दादोजी कोंडदेवाचे इतिहासातील स्थान" हा लेख आवर्जून वाचण्यासारखा आहे...
नागेश बापट नावाच्या लेखकाने १८८२ मध्ये "राजगुरू दादोजी कोंडदेव आणि शिवाजी महाराज" नावाचे भयानक खोटारडे ५९ पानी पुस्तक लिहून दादोजीला मोठे केले..व पुढे इतर संशोधकांनी त्याचीच री ओढली..ह्याचा समाचार धाटावकर ह्यांनी घेतला आहे.."दादोजी आणि रामदास ह्यांच्यामुळेच शिवाजी घडला" हा वर्णाभिमान दिसतो..असे दुर्दैवाने म्हणावे लागते असे धाटावकर ह्यांनी नमूद केले आहे..दादोजीचे स्वराज्य निर्मितीस योगदानच काय.?,दादोजीचा मृत्यू,अस्सल कागदपत्रातातून दादोजीचे नावहि नाही..अशा अनेक गोष्टींचा परामर्श भास्कर धाटावकर ह्यांनी घेतला आहे..दादोजीचे स्थान कार्य दखलघेन्या एवढेही नसताना दादोजीचे शिवइतिहासात उदात्तीकरण का केले जाते असा प्रश्न ते उपस्थित करतात..

Saturday, October 9, 2010

दादोजी कोंडदेव सत्य इतिहास - अनंत दारवटकर ("अद्वितीय छ.श्रीसंभाजी महाराज")

दादोजी कोंडदेव सत्य इतिहास भाग १
दादोजी कोंडदेव सत्य इतिहास (साभार: अनंत दारवटकर लिखीत "अद्वितीय छ.श्रीसंभाजी महाराज) दादोजी कोंडदेवाचे आडनाव "गोचिवडे" होते१.तो शहाजी महाराजांकडे ज्या परगण्यांची वंशपरंपरागत पाटीलकी व देशमुखी जहागीरी होती त्या हिंगणी,बेरडी व देऊळगाव या परग्ण्यांचा कुलकर्णी व कानुंगो होता२.तसेच तो पाटस परगण्यातील मलठण गावचा हिशेबनीस होता.हे सर्व तो विजापुरकरांचा कारकुन म्हणुन विजापुरकरांसाठी करत होता.विजापुरकरांचसाठी करत असलेल्या कामाबद्दल इ.स.१६३० मध्ये त्याची बढती हवालदार पदापर्यंत झालेली दिसुन येते.ता.१८ सप्टेंबर १६३० च्या कौलनाम्यात "राजश्री पंत हवालदाराच कौलु दिल्हा आहे"३असा उल्लेख सापडतो.लखोजी जाधवरावांच्या म्रुत्युनंतर शहाजीराजे आपल्या जहागिरीच्या प्रांतात परतले.ते परांड्यावरुन संगमनेर येथुन लुटालुट करत पुण्यात आले होते.व त्यांनी अदिलशाही व निजामशाहीकडील अनेक किल्ले व प्रदेश घेण्याचा सपाटा लावला होता.तेव्हा विजापुरच्या खवासखानाचा कारभारी मुरार जगदेव याच्या सेनापतीत्वाखाली अदिलशाही सैन्याने शहाजीराजांच्या जहागीरीच्या प्रांतावर स्वारी केली४.ही स्वारी त्याने शके १५५२ म्हणजे इ.स.१६३०-३१ मध्ये केलेली होती५.या स्वारीबरोबर शहाजीराजे ३० नोव्हेंबर १६३० मध्ये आजमखान मोगलास मिळाले६.इकडे मुरार जगदेवाने पुणे कसबा वस्ती जाळोन गाढवाचा नांगर पांढरीवर धरिला७.यामुळे ७-८ वर्षे म्हणजे इ.स.१६३७ पर्यंत म्हणजे शहाजीराजे अदिलशाहीत जाइतोपर्यंत पुणे कसबा ओस पडला होता७.याचे दायीत्व अदिलशाही हवालदार म्हणुन दादोजी कोंडदेवाकडे जाते.यावेळी पुणे प्रांत शहाजी राजांची जहागिरी असली तरी त्यावर तात्पुरता अंमल मुरार जगदेवाच्या स्वारीमुळे अदिलशाहाचा होता व दादोजी कोंडदेव त्याची हवालदारकी करीत होता. दरम्यान निजामशाहीमध्ये उलथा-पालथ झाली.या संधीचा नेमका फायदा घेण्यासाठी शहाजी राजे मोगलांकडुन निजामशाहीत परतले.त्यांनी मुर्तुजा निजामशहास मांडीवर घेउन निजामशाहीचा कारभार पुर्ण अखत्यारीत सुरु केला.त्याच वेळी अदिलशहाने कोंडदेवास,पुणे प्रांताचा जो भाग अदिलशहाच्या ताब्यात होता त्याचा सुभेदार दिवाण केले.म्हणजे दादोजी कोंडदेव पुणे प्रांतातील अदिलशाही भागाचा "सुभेदार"झाला.दादोजी कोंडदेव सुभेदार असल्याचा उल्लेख जाउजी बिन हरजी व बापुजी बिन खेउजी घुले पाटील मौजे महंमदवाडी यांच्यासाठी दि.६ डिसेंबर १६३३ रोजी दिलेल्या मह्जरात सापडतो८.म्हणजे दादोजी कोंडदेवाने पुणे जाळण्यासाठी अदिलशहाच्या मुरार जगदेवास जे सहकार्य दिले होते त्याचे बक्शिस म्हणुन त्याची बढती "हवालदार" पदापासुन "सुभेदार" पदापर्यंत झाली होती असे ठरते.


(पुरावे:१.म्ह्सवडे जोशी यांचा महजर:अफजलखान वध,पा.२० तळटीप:श्रीशिछ-त्र्यंशंशे,पा.३७१. २.तारीख-इ-शिवाजी:शिवाजी द ग्रेट,भा.१,पा.२,१७:श्रीशिछ-त्र्यंशंशे,पा.३७१. ३.शि.प.सा.सं.क्र.३१२, ४.बु.उ.स.पा.२९८, ५,६.सहाकलमी शकावली, शिचप्र.,पा.७०,७१. ७.बादशहानामा,श्रीराशिछ-गभामे,पा.५८३, ८.शि.प.सा.सं.क्र.३७०,३७१.)

शिवजन्मापासुन ते दादोजी कोंडदेव विजापुरकरांचा सुभेदार होण्यापर्यंतच्या काळामध्ये दादोजी हा,जिजाऊ व शिवाजींच्या सेवेत असण्याचा काडीमात्र संबंध येत नाही.इ.स.१६३२ ते १६३६ अखेरपर्यंत शहाजी राजे मुर्तुजा निजामशहास मांडीवर घेऊन.निजामशाही सिंहासनावर बसुन कारभार करीत होते,मोगल आणि विजापुरकर यांच्याशी सतत संघर्ष व लढाई करीत होते,त्यावेळेस दादोजी कोंडदेव हा,शहाजी राजांच्या विरुध्द असलेल्या विजापुरकरांसाठी काम करीत होता.मुरार जगदेवाने पुणे जाळल्याने व शहाजी राजांचे मोगल व विजापुरकर यांच्या बरोबरील सततच्या लढाईमुळे पुणे परगणा ओसाड बनला होता१.अखेर अदिलशहा व मोगल शहाजहान यांच्यात करार झाला.मोगलांचा सेनापती खानजमान हा शहाजी राजांवर माहुली किल्ल्यावर चालुन गेला.येथे काही बाबी अदिलशहाच्या लक्शात आल्यानंतर खानजमान या मोगलाकडील सेनापतीचा हात ढिलाइने चालु आहे हे कारण पुढे करुन अदिलशहाने रणदुल्लाखानास पुढे करुन खानजमानच्या मदतीस पाठवीले.त्याने शहाजी राजास अदिलशहाकडे वळविले.आणि शहाजीराजांबरोबर करार केला.या करारानुसार मुर्तुजा निजामशहास खानजमान या मोगलाचे हवाली करुन माहुलीचा किल्ला आदिलशाहीत देऊन शहाजी राजे आदिलशाहीत सामील झाले२.तेव्हा पुणे परगणाही विजापुरांकडे गेला.आदिलशहाने विजापुर येथे शहाजी राजांचा सत्कार केला.त्यांना हत्ती,घोडे,जवाहीर देऊन पुणे,सुपे,बारामती,इंदापुर व बारा मावळे यांचा सरंजाम दिला३.परंतु त्याच वेळी आदिलशहाने त्याच्या फायदयाची एक महत्वाची गोष्ट केली,ती म्हणजे,पुणे प्रांताची सरंजामी दिलेल्या शहाजी राजांस पाठवीले कर्नाटकात,विजापुरच्याही दक्षिणेकडे आणि पुणे प्रांताचा कारभार सोपविला आपला विश्वासू माणुस दादोजी कोंडदेवाकडे !म्हणजे विजापुरकराने शहाजी राजांची जहागिरी कायम ठेवली परंतु विजापुरकरांकडे नोकरीस असलेल्या दादोजी कोंडदेवाकडे परगण्याचा कारभार पाहणेसाठी आला४.यावरुन दादोजी कोंडदेव कोणासाठी काम करीत होता हे लक्षात येते.तत्पुर्वी म्हणजे सन १६३६ च्या अगोदर पुणे परगणा निजामशहाकडे शहाजी राजांची जहागीर म्हणुन होता.तेव्हा त्याचा कारभार शहाजी राजांकडेच होता.त्यावेळेस दादोजी कोंडदेव विजापुरकरांचा चाकर असल्यामुळे त्याचा शहाजी राजांशी तथा शहाजी राजांतर्फे पुणे परगण्याच्या कारभाराशी संबंध नव्ह्ता. मुरार जगदेवाने पुणे जाळल्यापासुन पुढे सात-आठ वर्षे कसबा ओस पडला होता५.शहाजीराजे आदिलशाहीत आल्यानंतर, त्याचा कारभार दादोजी कोंडदेवाकडे आल्यानंतर म्हणजे इ.स.१६३६-३७ नंतर दादोजीने पुणे,इंदापुर व सुपे परगण्यांचा कारभार विजापुरकरांसाठी इमाने-इतबारे हाकण्यास सुरुवात केली.तत्पुर्वी पुणे परगण्याची स्थिती अत्यंत वाईट होती.त्याने त्यानंतर जंगली श्वापदांचा नायनाट करुन शेतीस उत्तेजन दिले.त्याने मलिक अंबरची महसुलाची पध्द्त-मलिक अंबरी धारा -स्वीकारुन विजापुरकराच्या खजीन्यात भर घातली व शहाजी राजांच्या जहागीरीत सुधारणा केली६.दादोजीच्या या इमाने इतबारीच्या सेवेबद्दल विजापुररांनी त्यास कोंडाण्याची सुभेदारी दिली.दि.२६ जानेवारी १६३८ मध्ये त्याने तंट्याबद्दल दिलेला एक महजर आहे. त्यात दादोजी कोंडदेऊ सुभेदार किल्ले कोंढाणा असा ऊल्लेख सापडतो७.त्याचप्रमाणे कोंढीतचा मोकादम बाबाजी नेलेकर याच्या हातुन गावची लावणी होइना यामुळे जनाजी खैरे व रुद्राजी जाधव परिंचेकर यांना मोकादमीचा वाटा देऊ करुन त्यांनी काम चालवील्यामुळे उत्पन्न झालेल्या तोट्याबाबत दिलेल्या महजरात दादोजी कोंडदेव सुभेदार८ असा उल्लेख सापडतो.

(पुरावे:१.श्रीशिछ९१ कलमी बखर क्र.२१;श्रीशिछ-त्र्यंशंशे,पा.३७१-७२. २.बु.-उ.-स.,पा.३३३.३.चिट्णीस२प्रकरण २.२.४.पादशहानामा (आयबी १५०);Shivaji and his Times,4th edn.page 18-19;श्रीशिछ-त्र्यंशंशे,पा.३७१;श्रीशिछ सच - मराचिब प्रकरण २.२ सहा कलमी शकावली ५. सहा कलमी बखर ६.श्रीशिछ ९१ क.ब.क.२१,श्रीशिछ सच -मराचिब प्रकरण २.२,श्रीशिछ-त्र्यंशंशे,पा.३७२ ७.शि.प.सा.सं.क्र.४३२. ८.शि.प.सा.सं.क्र.४३६.)

Friday, October 8, 2010

दादोजी कोंडदेव: भ्रम आणि वास्तव

दादोजी कोंडदेव: भ्रम आणि वास्तव

by Sanjay Sonawani on Thursday, October 7, 2010 at 8:18pm

१. दादोजी कोंडदेव हे प्रथमपासुन शहाजी राजांचे चाकर होते.

-हे सत्य नाही. दादोजी कोंडदेव हे आदिलशहाचे १६३६ पर्यन्त चाकर होते आणि ते आदिलशहातर्फे कोंडाना किल्ल्याचे सुभेदार होते, ती सुभेदारी पुढेही कायम झाली पण शहाजी राजांनी त्यांना पुणे जहागिरीवर लक्ष्य ठेवण्यासाठी आपलीही चाकरी दिली. ते सी. के. पी. होते असा एक मतप्रवाह आहे, पण तोही खरा नाही. ते देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण होते. शिरुर तालुक्यातील मलठण हे त्यांचे मुळ गाव. १६३६ साली कोंड्देव शहाजी राजांच्या सेवेत आले आणि ७ मार्च १६४७ रोजी त्यांचे निधन झाले.

शिवाजी महाराजांचा जन्म १६३० साली झाला. तेंव्हा दादोजी कोंडाना किल्ल्यची सुभेदारी आदिलशहातर्फे पहात होते. कोंडाना किल्ला शिवाजी महाराजांनी १६५७ साली काबीज केला...तो शहाजी राजांच्या जहागिरीत नव्हता....पण दादोजी कोंडान्याचे सुभेदारही होतेच...पण हयातीत त्यांनी शिवाजीमहाराजांना तो किल्ला मिळु दिला नाही.

१६३६ ते म्रुत्युपर्यंत दादोजी शहाजीराजांच्या सेवेत होते. शिवाजी महाराज दादोजी सेवेत आले तेंव्हा ६ वर्षांचे होते. असे मानले जाते कि शिवाजीमहाराज यांना लिहिता वाचता येत नव्हते. दादोजी जर त्यांचे गुरु असते तर असे घडले नसते. दुसरे असे कि दादोजी हे शिवाजीमहाराजांच्या स्वराज्य प्रयत्नांबाबत नेहमीच विरोधात होते. दादोजी हे कोंडाना किल्ल्याचे सुभेदार असुनही त्यांनी हयातीत शिवाजी महाराजांच्या हवाली किल्ला केला नव्हता हेही येथे लक्षात ठेवायला हवे. "तारिख-इ-शिवाजी" असे म्हनते कि शिवाजी महाराजांच्या स्वराज्य-धडपडीला वैतागुन दादोजींनी वीष घेवुन आत्महत्या केली. त्यासमयी त्यांचे वय ७२ होते. आदिलशहाने शिक्षा म्हणुन दादोजींचा एक हात तोडला होता.(१६४५). त्यावेळी शिवाजीमहाराजांचे वय १५ वर्ष असेल. त्यामुळे युद्धकला दादोजींनी शिवाजी महाराजांना शिकवली असे म्हणता येत नाही...आणि नंतर अवघ्या २ वर्षांत दादोजींचे निधन झाले.

आता या पार्श्वभुमीवर लेन हा किती महामुर्ख इतिहासकार (?) असेल आणि त्याला विक्रुत माहिती पुरवणारे बाबासाहेब पुरंदरे ते गजानन मेहेंदळे असे १३ हे सर्व वा त्यापैकी काहीजन किती मनोविक्रुत असतील आणि यापैकी कोणीही "शिवप्रेमी" म्हणुन घेण्याच्या लायकीचे कसे नाहीत हे आपले मस्तक आपल्याच धडावर आहे असे समजतात त्या सर्वांनी लक्षात घ्यावे.


१६२५: शहाजी राजांनी रंगो बापुजी धडफळे यांस पुणे, सुपे प्रांताचा कारभारी म्हणुन नेमले होते. ही जहागिरी शहाजी राजांकडॆ १६२४ साली आली. जर दादोजी आणि शहाजीराजांची पुर्वापार मैत्री असती दादोजी हेच शहाजी राजांचे पहीले कारभारी बनले असते. शहाजीराजे... तेंव्हा निजामशाहीत होते.

१६३०: मुरारीपंत जोगदेव या विजापुरच्या ब्राह्म्न सरदाराने पुण्यावर हल्ला केला आणि पुणे पुरेपुर उध्वस्त करुन त्यावरुन गाढवाचा नांगर फिरवला. अदिलशहा शाहाजी राजांचा द्वेष करत होता हे स्पष्ट होते, कारण शहाजी राजे निजामशाहेचे शासक सरदार बनले होते. पुणे वाचवण्यासाठी आदिलशहाचाच कारभारी असलेल्या दादोजींनी प्रयत्न न करणे स्वाभाविक होते.

त्याच वर्षी शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. हा किल्ला तेंव्हा निजामशाहीत होता व जिजावु गरोदर असतांनाच तेथे एका विवाहाप्रित्यर्थ आल्या होत्या.

१६३६: निजामशाहीचा अंत आणि शहाजी राजांना आदिलशाहेत जाणे भाग पडने. त्याच वर्षी आदिलशहाचाच कारभारी असलेल्या दादोजींना पुणे-सुपे प्रांताचे कारभारी पद दिले. यामागे एकच हेतु असु शकतो तो हा कि नवीन राजकीय समीकरणांशी जुळवुन घायला वेळ मिळावा आणि आदिलशहाचे नवे संकट नको. पण याच वेळेस शहाजी राजे बाल शिवाजी (६ वर्ष वय) आणि जिजावुंना सोबत विजापुरी घेवुन गेले.

थोडक्यात दादोजी आणि शहाजीराजांची पुर्वापार मैत्री असण्याची शक्यता नाही. शहाजी राजांचा जन्म १६०१ मद्धे झाला. दादोजींचा जन्म १५७५ मधील. निजमशाही आणि आदिलशाही यातुन विस्तव जात नव्हता. पुण्यावर मुरारपंतांनी रानटी हल्ला चढवुनही दादोजींना पुणे वाचावे असे वाटलेले दिसत नाही. (ते कोंडाण्याचे सुभेदार होते) आणि याच दादोजींनी त्याच गाढवाचा नांगर एका ब्राह्मणानेच फिरवला त्याच उध्वस्त नगरात स्व:प्रेरणेने सोण्याचा नांगर फिरवण्याचे सोपस्कार केले असतील हे पटत नाही. त्यांनी शाहाजीराजांची इछा आणि आदेश पाळले असेच फार तर म्हनता येते...कारण ही जहागिर भविष्यासाठी त्यांनी हर-प्रकारे राखुन ठेवली...तीच जहागिर त्यांनी आपल्या पहिल्या स्वतंत्र्य लढ्यासाठी वापरली...ती अनेकदा जप्त झाली असली तरी पुन्हा पुन्हा त्याच जहगिरिच्या सनदा मिळवल्या, जी जहागिर आदिलशहाच्या नोकराने उद्ध्वस्त केली तीच जहागिर त्यांनी आदिलशहाच्याच कारभार्याहस्ते पुन्हा उभारुन घेतली...आणि आपल्या पुत्राहस्ते तीच पुण्यभूमी पहिल्या स्वराज्यासाठी पुत्रा-हवाली केली. येथे मला शहाजी महाराजांच्या दुरद्रुष्टीचे, कर्तेपणाचे आणि त्यांच्या परकोटीच्या आत्मभानाचे आदर्श सर्वांनी घ्यायला हवे असे वाटते. हेच गुण शिवाजीमहाराजांत स्फुल्लिंगाप्रमाणे त्यांच्या जीवनभर तळपतांना दिसतात.

या पार्श्वभुमीवर अत्यंत खोटे बिनदिक्कत सांगणार्यांची कीव वाटते... जेथे प्रतिवाद संपतो तेथे "आता जुन्या गोष्टी कशाला उगाळायच्या?" असे काहिसे म्हणुन पळवाट काढली जाते, पण या जुन्या गोष्टॆए ज्यांनी विक्रुत करुन ठेवल्या आहेत, सत्य दडपले आहे-लपवले आहे-लपवण्याचा प्रयत्न होतो आहे त्यांचे काय करायचे? "माझा बाप कोण होता" हे यांनीच बिनदिक्कतपणे सांगायचे....मला माझाच बाप कोण होता या शोधमोहिमेवर पाठवुन द्यायचे...आणि सत्य समोर आले कि जुने कशाला उकरत बसता हे यांचेच आलाप ऐकायचे हा धंदा आता चालणार नाही. मग ते कोणेही असोत...मनोविक्रुतांना कोणत्याही समाजात स्थान नसते. ते नसावे..



Monday, October 4, 2010

Tuesday, September 28, 2010

Bharat Mulkti Morchya And Sambhaji Brigade's combined program, Date: 24th Oct 2010, Place: S.S.P.M.S. Ground, Pune.

Bharat Mulkti Morchya And Sambhaji Brigade's combined program,about james laine's book and dadoji konddev statue reamoval from lal mahal...

Date: 24th Oct 2010
,
Place: S.S.P.M.S. Ground, Pune.



visit -

www.mulnivasibamcef.org

Tuesday, September 21, 2010

लालमहल दादोजीचा पुतला हि एक विकृति ...

एका परदेशी पर्यटकाने 2००३ मध्ये अपलोड केलेल्या फोटोत त्याचा मोठा गैरसमज झाल्याचे दिसते..ह्या फोटोत तो शिवाजी महाराज आपल्या पालकाकडून शिक्षण घेत असल्याचे लिहितो..ह्या पुतल्यामुले विकृति निर्माण होत आहे..व त्यातून शिवाजी महाराज, जिजाऊ आणि शाहजी राजांचा अपमान होत आहे..
त्या मुले कुठलाही वाद निर्माण न करता "शिवप्रेमिनी" दादोजिंचा आदर ठेवत तो पुतला काढावा..व इतर योग्य ठिकाणी बसवावा..कुठल्याही प्रकारची तोड़-फोड़ होता कामा नये..ह्याची कालजी घ्यावी..हेच योग्य ठरेल ..

Sunday, September 12, 2010

श्रीमंत कोकाटे ह्यांचा लेख

इतिहासकार श्रीमंत कोकाटे ह्यांचा दादोजी कोंडदेव प्रकरणावर प्रकाश टाकणारा झनित लेख ...

Monday, September 6, 2010


इन्द्रजीत सावंत ह्यांचा दैनिक पुढारी मधील हा लेख "दादोजी कोंडदेव वाद आणि वास्तव " येथे प्रकाशित करत आहोत..

Saturday, September 4, 2010

जाहिर आवाहन ...
पुण्यातील लाल महालात दादोजींचा पुतला कुठल्या ऐतिहासिक पुराव्यावारून बसविला ह्याचा कृपया पुरावा द्यावा...
दादोजी गुरु नाहीत हे तर सिद्ध झाले आहे..तेंव्हा दादोजीनी पुणे नांगरल्याचा कुठला अस्सल समकालीन पुरावाआहे ?? असल्यास सादर करावा ...!!
हे जाहिर आवाहन !!!

Tuesday, August 31, 2010

Who was Dadoji Konddev ???



Read Pudhari Article About Daoji Konddev's History By Historian Indrajeet Sawant.




Saturday, August 28, 2010

Remove Dadoji Konddev Statue- Chhatrapati Sambhaji Maharaj Of Kolhapur



Dadoji Konddev's Statue Should be Removed- Chhatrapati Yuvraj Sambhaji Raje Bhosale Of Kolhapur

Dadoji Kondev Statue Issue.....Some Opinions...

Remove Dadoji..because...

"Dadoji and Ramdas As Mentors of Shivaji Maharaj" has No Any Historical Evidence..Babasaheb Purandare is also unable to give any evident (historical proof) on this issue...so statue should be removed...Lal Mahal was chhatrapati shivaji maharaj and jijau-shahaji's resident..why some people wants Dadoji overthere..???
-Bhai Vaidya (Senior Samajwadi Leader)



Daoji Konddev's Statue should be removed..because ....

(1) Government of Maharashtra has changed the name of Dadoji Konddev Purskar as Utkrusht Krida Margdarshak Purskar...
and
(2) Paragraph About Dadoji Konddev As Shivaji Maharaj's Guru is also Removed From 4th Standerd History Book (Shivchhatrapati) by Balbharti,Pune.

Justice P.B.Sawant(Supreme Court) and Justice B.G.Kolse Patil ( Justice-High Court) are also demanding the same..

17 different organisations are protesting for Removal of dadoji statue from lal mahal...so why there is need of dadoji konddev's statue in lal mahal ???
-Pravin Gaikwad (Sambhaji Brigade)

shivpremi organisations demands removal of dadoji statue










Group demands quick action on Konddeo statue

Group demands quick action on Konddeo statue

TNN, Aug 28, 2010, 04.22am IST


PUNE: The Shivpremi Jan Jagaran Samiti ( SJJS), an umbrella organisation of 17 groups, said on Friday that the Pune Municipal Corporation (PMC) should remove Dadoji Konddeo's statue from Lal Mahal. Shrimant Kokate, a member of the state government-appointed committee of historians in 2008 to study the claims of a section of historians that Konddeo was Chhatrapati Shivaji's guru, said, "The committee was appointed by the governor's ordinance. While members Ninad Bedekar and G B Mehandale expressed their inability to work, others including A R Kulkarni, Anuradha Ranade, A H Salunkhe, Jaising Pawar, Vasant More, Gandhar Banbare, Chandrashekhar Shikhare and Praveen Gaikwad concluded that there was no evidence to prove that Dadoji was Chhatrapati Shivaji's guru." "Kulkarni was unable to attend the committee meetings due to ill health. However, he gave a written opinion that there was not a single piece of evidence to prove that Konddeo was Shivaji's guru. He was also surprised that the state government had instituted an award in Konddeo's name when he had played no role in guiding Shivaji. Subsequently, the state government made changes in history textbooks and also stopped awards instituted in Konddeo's name." The samiti's member Mukund Kakade said, "When the committee has come to the conclusion and the state government has accepted it, there is no point in the PMC appointing another committee of historians." Another samiti member Dnyaneshwar Darvatkar said, "The claims made by PMC leaders that the civic body had approved the resolution to erect statues at Lal Mahal is false. The resolution approved in June 2000 was about the inauguration of the statues and not erecting them." Konddeo's statue is part of a sculpture depicting Chhatrapati Shivaji, along with Jijamata, tilling the soil of Pune with a golden plough at Lal Mahal. "There is a link between the statue of Dadoji coming up along with Jijamata and Shivaji in 2000 and the derogatory remarks in James Laine's book. The PMC should not test the patience of Shivbhaktas. The statue must be removed immediately," said Kokate. Mayor Mohansingh Rajpal had, on Wednesday, said that the statue would be removed within 24 hours. However, on Thursday, he said the decision will be taken after a committee of historians to be appointed by the civic body, submits its report.

Thursday, August 26, 2010

दादोजी कोंडदेवांच्या पुतळाप्रश्नी समिती नेमनार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, August 26, 2010 AT 04:37 PM (IST)
Tags: lal mahal, pune, sambhaji brigade, municipal corporation, dadoji konddev
पुणे - लाल महालातील दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्यासंदर्भात सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन तज्ञांची समिती नेमावी. समिती जो अहवाल सादर करेल, त्यावर सर्वसाधारण सभेने निर्णय घ्यावा, असा निर्णय महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.२६) झालेल्या महापालिकेतील पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवावा, या मागणीसाठी लोकशासन आंदोलनाच्या वतीने काल महापालिकेवर धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी हा पुतळा चोवीस तासात हटविण्याचे आश्‍वासन महापौरांनी आंदोलनकर्त्यांना दिले होते. तसेच पुतळा हलविण्याचे आदेश द्यावेत, असे पत्र आयुक्तांना दिले होते. त्यावर आयुक्तांनी पुतळा हटविण्यासाठी सर्वसाधारण सभेची मान्यता घेणे आवश्‍यक आहे. त्यामुळे पक्षनेत्यांची बैठक घेऊन याबाबत निर्णय घ्यावा, असे पत्र महापौरांना काल रात्री पाठविले होते. त्यानुसार आज सकाळी पक्षनेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये हा ठराव करण्यात आला. त्यामुळे आता या विषयावर इतिहास तज्ञांची समिती नेमावी, त्यांच्याकडून जो अहवाल प्राप्त होईल, त्यावर सर्वसाधारण सभेने निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव पुढील महिन्याच्या सर्वसाधारण सभेपुढे सादर करण्यात येणार आहे.

लाल महालातील दादोजी कोंडदेव पुतळा हटवावा

दादोजी कोंडदेव हटवा ....







konddev statue will be shifted in 24 hrs- Mayor , pune

Konddeo's statue will be shifted in 24 hrs: Mayor
TNN, Aug 26, 2010, 04.52am

PUNE: The statue of Dadoji Konddeo will be removed from the historic Lal Mahal, which was the residence of Chhatrapati Shivaji Maharaj, within 24 hours. The assurance was given by Pune mayor Mohansingh Rajpal on Wednesday to protesting Lokshasan Andolan members, who were led by former justices P B Sawant and B G Kolse Patil. The protestors had gheraoed the PMC headquarters in large numbers for more than five hours, demanding the removal of the statue from Lal Mahal. Meanwhile, 53 protestors were arrested late on Thursday evening. Senior inspector Sampat Patil of the Shivajinagar police, however, said, "We will release them on bail." Konddeo's statue is part of a sculpture depicting Chhatrapati Shivaji, along with Jijamata, tilling the soil of Pune with a golden plough. Konddeo, according to some historians, guided Shivaji during his childhood. However, some historians say that he was not Shivaji's teacher. "We will ensure that the statue is removed from Lal Mahal within 24 hours. I will place the issue before all party leaders and, by tomorrow (Thursday) evening, the statue will be removed. I promise that we will not retract on this stand," said Rajpal while speaking to the protestors. Standing committee chairman and Congress corporator Arvind Shinde supported the mayor's stand and said the statue will be removed without any delay. In a late evening development, Rajpal handed over a letter to the civic administration directing removal of the statue. Speaking to TOI, Rajpal said, "When the statue was erected, the General Body's permission was not taken. Also, we considered the fact that the state government had stopped giving awards in the name of Konddeo and that his reference as guru of Shivaji has been deleted from the textbook. The state government has already said that there is nothing to prove that Konddeo was Chhatrapati Shivaji's guru. It is necessary to maintain law and order in the city."

IBN LOKMAT POLE


आजचा सवाल


लाल महालातून दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलवणं योग्य आहे का?
25 ऑगस्ट 2010 , 9:45 PM
लाल महालातून दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलवणं योग्य आहे का? असा आजचा चर्चेचा विषय होता.
समस्त हिंदू आघाडी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, माजी न्यायमुर्ती बी जी कोळसे-पाटील, संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष प्रविण गायकवाड, इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, महापौर मोहनसिंग राजपाल, भाजपचे कार्यकर्ते संदीप खर्डेकर सहभागी झाले होते.

RESULTS

YES - 75% -REMOVE DADOJI KONDDEV STATUE

NO - 25% -DON'T REMOVE


FROM -WWW.IBNLOKMAT.TV , http://ibnlokmat.tv/showvideo.php?id=117112




लाल महालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलवा
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, August 25, 2010 AT 07:26 PM (IST)
Tags: lal mahal, pune, sambhaji brigade, municipal corporation
पुणे - "लाल महालातील शिल्पसमूहामधील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा चोवीस तासांत हलवावा,' असे पत्र महापौर मोहनसिंग राजपाल यांनी महापालिका आयुक्तांना बुधवारी दिले. या पत्राची प्रत महापौरांनी लोकशासन आंदोलनाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांना दिली. लोकशासन आंदोलनातर्फे दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलविण्यासाठी बुधवारी दुपारपासून महापालिका भवनासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आदिवासी, कातकरी, मच्छीमार सहभागी झाले होते.
लोकशासन आंदोलनाचे संस्थापक निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, बद्रिनाथ तनपुरे महाराज, प्रतिमा परदेशी, रवींद्र माळवदकर, विकास पासलकर यांच्यासह विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. "पुतळा हटविण्याचा निर्णय घ्या, नाही तर अटक करा,' अशी भूमिका या वेळी आंदोलकांनी घेतली. नंतर आंदोलन सुरू असताना महापौरांनी येऊन "पक्षनेत्यांची तातडीने बैठक घेऊन चोवीस तासांत पुतळा हटविण्याचा निर्णय घेण्यात येईल,' असे जाहीर केले. त्यानंतर सायंकाळी पक्षनेत्यांची तातडीची बैठक झाली. या बैठकीनंतर माहिती देताना महापौर म्हणाले, ""लोकशासन आंदोलन, संभाजी ब्रिगेड गेल्या अनेक दिवसांपासून पुतळा हटविण्याची मागणी करीत आहेत.
या संदर्भात महापालिकेने राज्य सरकारकडे पत्र पाठविले होते. त्यावर दादोजी कोंडदेव छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते, असा कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही, असे राज्य सरकारने महापालिकेला कळविले होते. तसेच महापालिका स्तरावर याबाबतचा निर्णय घ्यावा, असेही त्यात स्पष्ट करण्यात आले होते. लाल महालात बसविण्यात आलेल्या शिल्पसमूहास सर्वसाधारण सभेची मान्यता घेण्यात आलेली नाही. त्यामुळे या शिल्पातील कोंडदेव यांचा पुतळा येत्या 24 तासांत तेथून हलविण्याचे आदेश द्यावेत, असे पत्र आपण आयुक्तांना दिले आहे.''
"शहरातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती व शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेऊन आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात हा पुतळा काढण्याबाबत निर्णय घ्यावा,' असे आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केल्याचे महापौरांनी सांगितले. दरम्यान, रात्री आठनंतर कोळसे पाटील यांच्यासह 53 जणांना पोलिसांनी अटक केली. प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला. त्यांना शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. पुतळा हलविण्याचे पत्र महापौरांनी आयुक्तांना दिल्यावर त्याची प्रत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात जाऊन कोळसे पाटील यांना दिली. या वेळी स्थायी समितीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. अटक केलेल्या पाच महिलांसह सर्वांची रात्री उशिरा जामिनावर सुटका करण्यात आली.तत्पूर्वी, महापालिका भवनासमोर झालेल्या सभेत न्यायमूर्ती पी. बी. सावंत म्हणाले, ""शहाजीराजे शिवाजी महाराजांचे वडील होते, हा मुद्दा स्वयंसिद्ध आहे. तो वादाचा मुद्दा होऊ शकत नाही. ज्यांना खुमखुमी आहे, ते असा प्रश्‍न उपस्थित करून अन्न, वस्त्र, निवारा या प्रश्‍नांपासून समाजाला बाजूचा नेण्याचा प्रयत्न करत आहेत. या देशात महापुरुषांबद्दल घाणेरडे बोलण्याचा मानसिक महारोग झाला आहे. जाणूनबुजून बहुजन समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ते करत आहेत.''
कोळसे पाटील म्हणाले, ""सर्व कष्टकरी, आदिवासी, कुणबी या आंदोलनात आहेत. जिजामाता व छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे दैवत आहे. त्यांची बदनामी आम्ही खपवून घेणार नाही. शिवाजी महाराजांनी मच्छीमारांना आरमार मिळवून दिले, तर आदिवासी, कातकऱ्यांना राजा केले. त्यामुळे शिवाजी महाराज हे एका जातीची मक्तेदारी नाही. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलविण्याच्या माध्यमातून अन्यायाच्या लढाईची ही सुरवात आहे. जेम्स लेनने लिहिलेल्या पार्श्‍वभूमीवर हा पुतळा हलविणे आवश्‍यक आहे.''
तनपुरे महाराज म्हणाले, ""लोकशासन आंदोलनाबरोबर सर्व वारकरी, कष्टकरी आहेत. या आंदोलनात आम्ही आघाडीवर राहू.''
... लढा मराठा विरुद्ध ब्राह्मण असा नाही"

लाल महालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा काढण्याचा हा लढा मराठा विरुद्ध ब्राह्मण असा नाही. दादोजींच्या नावाने अभिजन वर्गात शंभर वर्षांपासून कुजबूज होती. या पार्श्‍वभूमीवर हा पुतळा काढलाच पाहिजे. महापालिकेने पुतळा काढण्याचा निर्णय घेतल्याने दलित, आदिवासी, मच्छीमार, कातकरी या सर्वांसह या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांचा विजय झाला आहे,' अशी प्रतिक्रिया कोळसे पाटील यांनी रात्री "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.

Friday, August 6, 2010

दादोजी कोडदेव हटवा....

Friday, August 06, 2010 AT 12:04 AM (IST)

पुणे - 'जेम्स लेनच्या पुस्तकावरील बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात न्यायालयाचा अवमान होऊ न देता सर्व जनतेने एकजुटीने आणि लोकशाही मार्गाने लढणे आवश्‍यक आहे,'' असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी गुरुवारी व्यक्त केले.जेम्स लेनच्या "शिवाजी - द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या वादग्रस्त पुस्तकावरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच हटविली. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी शिवप्रेमी जनजागरण समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या निषेध सभेत आढाव बोलत होते. न्या. बी. जी. कोळसे पाटील, सत्यशोधक चळवळीच्या प्रतिमा परदेशी, समितीचे अध्यक्ष मुकुंद काकडे व्यासपीठावर उपस्थित होते.आढाव म्हणाले, 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ काहीही लिहिणे अथवा बोलणे असा नाही. त्यालाही काही मर्यादा आहेत. शिवछत्रपतींबद्दल अवमानकारक लिखाण करणे, हा लेनचा हलकटपणाच आहे. हा प्रश्‍न न्यायालयासमोर गांभीर्याने न मांडल्यानेच पुस्तकावरील बंदी हटविली गेली. त्याविरोधात व्यापक आंदोलन करायला हवे.'' कोळसे पाटील म्हणाले, 'अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर असणाऱ्या मर्यादांमध्ये व्यक्तिगत अवमानाबाबत घटनेत स्पष्ट उल्लेख आहेत. सर्वोच्च न्यायालयात त्याबद्दलचा खटला लढताना या बाबीकडे झालेल्या दुर्लक्षामुळेच या पुस्तकावरील बंदी हटवली गेली.'' परदेशी म्हणाल्या, "" या पुस्तकाच्या निमित्ताने समोर आलेल्या इतिहासाच्या विकृतीकरणाबाबत गाफील राहून चालणार नाही.

बावन्न जणांना अटक
भरतनाट्यमंदिरापासून कसबा पेठेतील लाल महालाजवळ निघालेल्या मोर्चाला फुटका बुरूज चौकात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात रात्री अडविले. कोळसे-पाटील यांच्यासह 52 जणांना अटक करून त्यांना शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात नेण्यात आले. जमावबंदी आदेशाचा भंग करणे, अडथळा निर्माण करणे आदी कलमांन्वये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त ज्ञानेश्‍वर फडतरे यांनी दिली. रात्री उशिरा आंदोलकांची जामिनावर सुटका झाली.

Saturday, July 31, 2010

'Remove Dadoji Konddev's statue from Lal Mahal'

'Remove Dadoji Konddev's statue from Lal Mahal'
Article from: DNA : Daily News & Analysis
Article date: July 12, 2010
Author: Jadhav, Ashish
Furious over the Supreme Court's (SC) decision to lift the ban on James Laine's book Shivaji: Hindu King In Islamic India published by the Oxford University Press, Maratha outfit Sambhaji Brigade on Sunday demanded removal of the statue of Dadoji Konddev from Lal Mahal.
Agitating at Rani Jhansi Chowk against the book, the activists demanded that the Pune Municipal Corporation (PMC) immediately remove the statue of Konddev, who was "falsely portrayed as Shivaji's guru."
The activists said historians Ninand Bedekar and Shrikant Bahulkar were "frauds" and "had concocted history aimed at wedging a split between communities so that it benefited the hegemony of a vested section, …